शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

सोयाबीनच्या बोगस बियाणांप्रकरणी पुरवठादार, बियाणे निरीक्षकांवर फौजदारी कारवाई करा; खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:21 IST

सुमोटो : ‘लोकमत’सह इतर वृत्तपत्रांमधील वृत्ताची खंडपीठाकडून दखल

ठळक मुद्देमाहिती सादर करण्याचे शासनाला आदेश

औरंगाबाद : सोयाबीनचे बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्या, पुरवठादार व बियाणे निरीक्षकांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत. सोयाबीनच्या बियाणांची पेरणी केल्यानंतर उगवले नसल्याबाबत ‘लोकमत’सह इतर दैनिकांनी आणि वृत्त वाहिन्यांनी बातमी प्रसारित केली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे बातमीत म्हटले होते. या बातमीलाच खंडपीठाने सुमोटो याचिका म्हणून शुक्रवारी दाखल करून घेतले.  

लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नगर जिल्ह्यांमध्ये बनावट सोयाबीन बियाणांची विक्री झाली असून, त्यांची उगवणच झाली नाही, असे बातम्यांमध्ये म्हटले होते. न्यायालयाचे मित्र म्हणून अ‍ॅड. पी. पी. मोरे यांची खंडपीठाने नेमणूक केली असून, याचिकेवर  ३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

सोयाबीन उगवण न झाल्याने शेतकरी, तसेच देशाचेही मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील शेतकरी अत्यंत गरीब असून, त्यांना पुन्हा नव्याने पेरणी करणे अत्यंत जिकिरीचे जाणार आहे. धान्य पिकविण्यासाठी शेतकरी धडपडत असताना त्याच्या माथी बोगस बियाणे मारले जात आहे. बियाणे कायद्यांतर्गत बोगस बियाणे उत्पादित आणि विक्री करणाऱ्यांविरोधात किती कारवाया प्रत्येक तालुक्यात करण्यात आल्या, किती बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले, याची माहिती सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा व तालुका कृषी अधिकारी, तसेच बियाणे निरीक्षक अशा प्रकरणांत काय कारवाई करतात, याचेही स्पष्टीकरण खंडपीठाने मागविले आहे. पाच वर्षांत अशा किती कारवाया केल्या याचीही माहिती सादर करण्याचे निर्देशित केले आहे. येथून पुढे अशा बोगस बियाणांची बियाणे निरीक्षकाकडे तक्रार करून प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रारी द्याव्यात. पोलिसांनी अशा तक्रारी दाखल करून घ्याव्यात, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. शासनाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानेश्वर काळे काम पाहत आहेत.

माहिती सादर करण्याचे शासनाला आदेशबियाणे कायद्यानुसार कारवाई करताना शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी पोलिसांनी घ्याव्यात तसेच औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील बोगस बियाणांच्या प्रकरणांची माहिती सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ