शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

किडनीला जपा, नाही तर दाता शोधून ठेवा ! मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:30 IST

जागतिक मूत्रपिंड दिन: औरंगाबादेत महिन्याला चार हजार डायलिसिस; मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : मूत्रपिंड (किडनी) हा मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. ही किडनी खराब झाली तर काय यातना होतात, हे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयच सांगू शकतात. औरंगाबादेत महिन्याला चार हजार रुग्णांचे डायलिसिस होतात. मराठवाड्यात ३०० रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. वैद्यकीय तज्ज्ञ किडनीची तुलना सुपर काॅम्प्युटरशी करतात. कारण किडनीची रचना खूप अनोखी आणि कार्य गुंतागुंतीचे आहे. किडनी शरीरातील रक्त साफ करून मूत्राची निर्मिती करते. शरीरातील पाणी, आम्ल, क्षार, अन्य घटक आणि शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांचे संतुलन बिघडले तर धोकादायक ठरू शकते. डायलिसिस करणाऱ्या क्राॅनिक किडनी फेल्युअरच्या ४० टक्के रुग्णांची किडनी खराब होण्याचे कारण मधुमेह असतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

किडनी निरोगी राहण्यासाठी...-रोज तीन लिटरहून अधिक (१० ते १२ ग्लास) पाणी प्यावे.- नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे.- ४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.-धूम्रपान, तंबाखू, गुटखा आणि मद्याचे व्यसन टाळावे.- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक औषधी घेऊ नयेत.- मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वयाच्या २० वर्षांनंतर आरोग्य तपासणी करणे.- वयाच्या चाळिशीनंतर कोणताही त्रास नसला तरी नियमितपणे आरोग्य तपासणी करणे.

दररोज एकावर प्रत्यारोपणमधुमेह, उच्च रक्तदाब, अतिस्थूल अशा अनेक कारणांनी किडनी विकाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. दररोज एकावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ येत आहे. मराठवाड्यात तीनशे रुग्णांना किडनी मिळण्याची प्रतीक्षा आहे.- डाॅ. सुधीर कुलकर्णी, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती

...तर धोका टाळणे शक्यभारतासह जगभरात किडनी फेल्युअरचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणाबाहेरील शुगर आहे. त्यामुळे जर शुगर नियंत्रणात ठेवली तर किडनी फेल्युअरचा धोका टाळणे शक्य आहे.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह आणि आंतरग्रंथी तज्ज्ञ

वेळीच उपचार करावेतकिडनीचे अनेक आजार खूप गंभीर असतात. त्यावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर काहीच फायदा होत नाही. डायलिसिस, किडनी प्रत्यारोपणासारखे उपचार प्रचंड महाग आहेत. त्यामुळे आरोग्याकडे, आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.- डाॅ. वाजेद मोगल, किडनी विकारतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य