शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

किडनीला जपा, नाही तर दाता शोधून ठेवा ! मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:30 IST

जागतिक मूत्रपिंड दिन: औरंगाबादेत महिन्याला चार हजार डायलिसिस; मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : मूत्रपिंड (किडनी) हा मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. ही किडनी खराब झाली तर काय यातना होतात, हे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयच सांगू शकतात. औरंगाबादेत महिन्याला चार हजार रुग्णांचे डायलिसिस होतात. मराठवाड्यात ३०० रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. वैद्यकीय तज्ज्ञ किडनीची तुलना सुपर काॅम्प्युटरशी करतात. कारण किडनीची रचना खूप अनोखी आणि कार्य गुंतागुंतीचे आहे. किडनी शरीरातील रक्त साफ करून मूत्राची निर्मिती करते. शरीरातील पाणी, आम्ल, क्षार, अन्य घटक आणि शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांचे संतुलन बिघडले तर धोकादायक ठरू शकते. डायलिसिस करणाऱ्या क्राॅनिक किडनी फेल्युअरच्या ४० टक्के रुग्णांची किडनी खराब होण्याचे कारण मधुमेह असतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

किडनी निरोगी राहण्यासाठी...-रोज तीन लिटरहून अधिक (१० ते १२ ग्लास) पाणी प्यावे.- नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे.- ४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.-धूम्रपान, तंबाखू, गुटखा आणि मद्याचे व्यसन टाळावे.- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक औषधी घेऊ नयेत.- मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वयाच्या २० वर्षांनंतर आरोग्य तपासणी करणे.- वयाच्या चाळिशीनंतर कोणताही त्रास नसला तरी नियमितपणे आरोग्य तपासणी करणे.

दररोज एकावर प्रत्यारोपणमधुमेह, उच्च रक्तदाब, अतिस्थूल अशा अनेक कारणांनी किडनी विकाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. दररोज एकावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ येत आहे. मराठवाड्यात तीनशे रुग्णांना किडनी मिळण्याची प्रतीक्षा आहे.- डाॅ. सुधीर कुलकर्णी, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती

...तर धोका टाळणे शक्यभारतासह जगभरात किडनी फेल्युअरचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणाबाहेरील शुगर आहे. त्यामुळे जर शुगर नियंत्रणात ठेवली तर किडनी फेल्युअरचा धोका टाळणे शक्य आहे.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह आणि आंतरग्रंथी तज्ज्ञ

वेळीच उपचार करावेतकिडनीचे अनेक आजार खूप गंभीर असतात. त्यावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर काहीच फायदा होत नाही. डायलिसिस, किडनी प्रत्यारोपणासारखे उपचार प्रचंड महाग आहेत. त्यामुळे आरोग्याकडे, आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.- डाॅ. वाजेद मोगल, किडनी विकारतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य