शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वक्फच्या ७ सदस्यांवर फौजदारी कारवाई करा; राज्य अल्पसंख्याक विभागाचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 12:07 IST

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने वक्फ मंडळावरील तब्बल ७ सदस्यांवर फौजदारी कारवाई करा, असे आदेश सीईओंना दिले आहेत

औरंगाबाद : वक्फ बोर्डमधील अनियमिततेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने वक्फ मंडळावरील तब्बल ७ सदस्यांवर फौजदारी कारवाई करा, असे आदेश सीईओंना १४ सप्टेंबर रोजी दिले आहेत. वक्फ मंडळात पूर्णवेळ सीईओ नाहीत. त्यामुळे एवढी मोठी कारवाई करायला कोणीही तयार नाही. वक्फ बोर्डातील अनियमित कारभारासंदर्भात आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी शासनाकडे पुराव्यांसह तक्रार केली होती.

२९ नोव्हेंबर २०१७ मध्ये अन्सारी यांनी अल्पसंख्याक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शासनाने प्राथमिक छाननी केली. ज्या वक्फ सदस्यांनी अनियमितता केल्याचा आरोप होता त्यांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी शासनाने दिली. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नव्हते. सदस्यांनी वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदींचा भंग केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. प्रत्येक अनियमिततेसंदर्भात स्वतंत्र फौजदारी कारवाई करावी, असेही आदेश वक्फ बोर्डाच्या सीईओंना देण्यात आले आहेत. शासन आदेशाचे अनुपालन अहवाल सादर करावे, असेही अवर सचिव म.स. चौकेकर यांनी आदेशात म्हटले आहे. 

अनियमिततेचा आरोप असलेल्या जागादर्गाह हजरत जियाउद्दीन अल-रिफाई, देलगूर येथील जागा बेकायदेशीरपणे भाडेपट्ट्यावर देण्यात आली.माहिम येथील जामा मशिदीच्या विश्वस्त पदावरील नियुक्तीत फेरफार प्रकरण.नागपूर येथील झिंगाबाई टाकळी येथील जमिनीत प्लॉट पाडल्यानंतर प्रकरण नियमित करून देणे.अहमदनगर भागातील भिंगार येथील जमीन ९९ वर्षांच्या भाडे करारावर दिल्याचे प्रकरण.

सात सदस्य कोणते?

हबीब फकीह, दुर्राणी अब्दुल्ला खान ऊर्फ बाबाजानी, सय्यद जमील जानीमियाँ, मौलाना गुलाम वस्तानवी, अ‍ॅड. आसीफ शौकत कुरैशी, जैनुद्दीन जव्हरी, अ‍ैनुल अत्तार.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारCrime Newsगुन्हेगारी