शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धाडसी पाऊल टाकत पारंपरिक शेतीला फाटा; पपई, टरबुजांनी केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 13:41 IST

भोपा येथील शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, शेत मालाला राज्याबाहेरही मिळतोय चांगला भाव

- संतोष स्वामीदिंद्रुड (जि. बीड) : पारंपरिक शेतीला फाटा देत धारूर तालुक्यातील भोपा येथील एका तरुण शेतकऱ्याने दोन एकरांत पपई व टरबुजाची लागवड करीत तीन लाखांचे उत्पन्न कमावले आहे. यामुळे या युवकाची प्रयोगशील शेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

भोपा येथील रवी वाघचौरे या शेतकऱ्याने मे महिन्यात तायवान ७८६ या जातीच्या पपईची एक एकर परिसरात लागवड केली. सिरसाळा येथील मयंक गांधी यांच्या संस्थेच्या रोपवाटिकेतून पपईच्या रोपांची खरेदी केली. भेसळडोस, रोपलागवड, खत, खुरपणी, मजुरी, फवारणीवर जवळपास ९० हजारांचा खर्च एक एकर पिकांसाठी या शेतकऱ्याला लागला. ऑक्टोबर महिन्यापासून पपईचे पीक तोडणीला आले असून, जवळपास दोन लाखांचे उत्पन्न या लागवडीतून त्यांना मिळाले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस टरबूज हे पीक एक एकर परिसरात रवी यांनी लावले होते. केवळ ६० दिवसांत ५० हजार रुपयांचा खर्च करून एक लाख रुपयांचे उत्पन्न या टरबुजाच्या पिकातून त्यांना मिळाले. मी माझ्या शेतीत सोयाबीन व कापूस लागवड करायचो. मात्र मित्र राजेभाऊ धुमाळ यांच्या मार्गदर्शनामुळे मी पपई व टरबूज या पिकांच्या लागवडीकडे वळलो. योग्य वेळी फवारणी, योग्य वेळी खतपाणी केल्यामुळे मला समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नगदी पिके घ्यावीत, असे आवाहन रवी वाघचौरे यांनी केले आहे.

पंजाब, बंगाल, दिल्लीतून मोठी मागणीआगामी काळात पपईचे तीन लाखांचे तर टरबुजास दीड लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा रवी वाघचौरे यांनी व्यक्त केली आहे. पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या बाजारपेठेत पपई व टरबुजाला चांगला भाव मिळत असून, या नगदी पिकांमुळे शेतकरी संतुष्ट आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पपईला २२, तर टरबुजाला १० रुपये किलोचा भावपपई व टरबुजाच्या पिकांसाठी हलकी ते मध्यम, पाणी निचरा होणारी जमीन लागते. जवळपास दोन ते अडीच किलो वजनाचे पपईचे फळ व पाच ते सहा किलोंचे टरबुजाचे एक फळ वाघचौरे यांच्या हाती लागले आहे. सद्य:स्थितीत पपईला २२ रुपयांचा, तर टरबुजास १० रुपयांचा प्रतिकिलो भाव मिळत आहे.

प्रगतिशील शेतीचा मार्ग योग्य नियोजनातूनशेतकऱ्याने नवनवीन पीकलागवड करताना रोगप्रतिकारक शक्ती असलेली, त्याचप्रमाणे समान वजनाची व लंबगोल, एकसारख्या आकाराची फळे देणाऱ्या हमीपात्र कंपनीच्या बियांची लागवड करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळणे आवश्यक असून, प्रगतिशील शेतीचा मार्ग योग्य नियोजनातून साकारता येतो.- राजेभाऊ धुमाळ, कृषी सेवा केंद्र चालक, दिंद्रुड

टॅग्स :agricultureशेतीBeedबीडFarmerशेतकरी