शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तहसीलचा ताण होणार हलका

By admin | Updated: July 14, 2014 01:05 IST

औरंगाबाद : महसूलमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाचा प्रस्ताव नव्याने राज्य सरकारकडे नुकताच सादर केला आहे.

औरंगाबाद : महसूलमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाचा प्रस्ताव नव्याने राज्य सरकारकडे नुकताच सादर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम अशा दोन तहसीलची शिफारस करण्यात आली आहे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे महिनाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळून दोन तहसील अस्तित्वात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. लोकसंख्येचा विचार करता औरंगाबाद तहसीलचे विभाजन करावे, अशी जुनीच मागणी आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी प्रस्तावाद्वारे शासनाकडे ही मागणी केलेली आहे. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झाली नव्हती. महिनाभरापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत तहसील विभाजनाच्या विषयावर बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी विक्रमकुमार, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आढावा घेतल्यानंतर थोरात यांनी तहसीलच्या विभाजनासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाला नवीन प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच म्हणजे महिनाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळून औरंगाबादेत दोन तहसील कार्यालये अस्तित्वात येतील, असे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद पूर्वचे कार्यक्षेत्रपूर्व मतदारसंघात ग्रामीण भागातील सुमारे २०० महसुली खेडी असणार आहेत. यातील काही खेडी सध्या पैठण आणि काही फुलंब्री विधानसभा मतदारसंघात येतात. पश्चिमचे कार्यक्षेत्रनव्याने स्थापन होणाऱ्या पश्चिम तहसीलअंतर्गत औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम हे तीन विधानसभा मतदारसंघ असतील. आकृतिबंधही सादर महसूल खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांकडे प्रस्ताव नुकताच सादर केला आहे. त्यात औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम अशा दोन तहसील कार्यालयांची स्थापना करावी, असे म्हटले आहे. दोन्ही कार्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधांचा आकृतिबंधही सादर करण्यात आला आहे.-बप्पासाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी, औरंगाबादतहसीलच्या विभाजनाची गरज काय?औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार आहे. त्यापैकी सुमारे १८ लाख लोकसंख्या ही एकट्या औरंगाबाद तहसील कार्यक्षेत्रात राहते. उर्वरित १९ लाख लोकसंख्या ही जिल्ह्यातील ९ तहसील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे साहजिकच औरंगाबाद तहसीलवर कामाचा प्रचंड ताण आहे. औरंगाबाद तहसीलअंतर्गत औरंगाबाद शहर आणि तालुक्यातील २२६ महसुली खेडी आहेत. यात शहराची लोकसंख्या १४ लाख असून, ग्रामीण भागाची लोकसंख्या चार लाख आहे. लोकसंख्येचा एवढा ताण असताना औरंगाबाद आणि लगतचा परिसर झपाट्याने वाढत आहे. परिणामी, या भागात जमिनीच्या अकृषक परवान्याची (एनए) प्रकरणे, जमिनीचे गैरव्यवहार वाढले आहेत. तसेच शहरालगत वर्ग-२ च्या म्हणजे शासकीय गायरान आणि कुळाच्या जमिनी खूप जास्त आहेत.