शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

हयात असतानाच स्वामीनाथन् यांना भारतरत्न मिळायला हवे होते; कन्या मधुरा यांची खंत 

By स. सो. खंडाळकर | Updated: March 7, 2024 14:00 IST

शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे.

छत्रपती संभाजीनगर : गेली साठ वर्षे डॉ. स्वामीनाथन यांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते हयात असतानाच त्यांना भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी भावना त्यांच्या कन्या डॉ. मधुरा स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

बुधवारी सायंकाळी त्या सीटू भवनात पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. मधुरा स्वामीनाथन या राष्ट्रीय सांख्यिकी संस्था बंगळूर येथे अर्थशास्त्रीय मूल्यमापन विभागप्रमुख आहेत. माजलगाव येथे किसान सभेच्या वतीने आयोजित किसान मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी त्या रवाना होतील.

त्यांनी सांगितले की, या देशातील ४० टक्के छोटे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळायला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना एमएसपीच माहीत नाही. 

भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत मधुरा म्हणाल्या, सरकार बदलल्याने खूप काही फरक पडू शकेल. शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार थेट मदत पाठवते, याकडे लक्ष वेधताच त्यांनी सागितले की, जी रक्कम पाठवली जाते, ती तुटपुंजी आहे.

आगामी काळात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करू शकाल काय, असे विचारता त्या म्हणाल्या, मुळीच नाही. पण या आंदोलनांना मदत करण्याची माझी भूमिका राहील. या पत्रपरिषदेस माकपचे सचिव कॉ. भगवान भोजने व सेल्वन डॅनियल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद