शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

हयात असतानाच स्वामीनाथन् यांना भारतरत्न मिळायला हवे होते; कन्या मधुरा यांची खंत 

By स. सो. खंडाळकर | Updated: March 7, 2024 14:00 IST

शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे.

छत्रपती संभाजीनगर : गेली साठ वर्षे डॉ. स्वामीनाथन यांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते हयात असतानाच त्यांना भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी भावना त्यांच्या कन्या डॉ. मधुरा स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

बुधवारी सायंकाळी त्या सीटू भवनात पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. मधुरा स्वामीनाथन या राष्ट्रीय सांख्यिकी संस्था बंगळूर येथे अर्थशास्त्रीय मूल्यमापन विभागप्रमुख आहेत. माजलगाव येथे किसान सभेच्या वतीने आयोजित किसान मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी त्या रवाना होतील.

त्यांनी सांगितले की, या देशातील ४० टक्के छोटे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळायला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना एमएसपीच माहीत नाही. 

भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत मधुरा म्हणाल्या, सरकार बदलल्याने खूप काही फरक पडू शकेल. शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार थेट मदत पाठवते, याकडे लक्ष वेधताच त्यांनी सागितले की, जी रक्कम पाठवली जाते, ती तुटपुंजी आहे.

आगामी काळात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करू शकाल काय, असे विचारता त्या म्हणाल्या, मुळीच नाही. पण या आंदोलनांना मदत करण्याची माझी भूमिका राहील. या पत्रपरिषदेस माकपचे सचिव कॉ. भगवान भोजने व सेल्वन डॅनियल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद