शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

हयात असतानाच स्वामीनाथन् यांना भारतरत्न मिळायला हवे होते; कन्या मधुरा यांची खंत 

By स. सो. खंडाळकर | Updated: March 7, 2024 14:00 IST

शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे.

छत्रपती संभाजीनगर : गेली साठ वर्षे डॉ. स्वामीनाथन यांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते हयात असतानाच त्यांना भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी भावना त्यांच्या कन्या डॉ. मधुरा स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

बुधवारी सायंकाळी त्या सीटू भवनात पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. मधुरा स्वामीनाथन या राष्ट्रीय सांख्यिकी संस्था बंगळूर येथे अर्थशास्त्रीय मूल्यमापन विभागप्रमुख आहेत. माजलगाव येथे किसान सभेच्या वतीने आयोजित किसान मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी त्या रवाना होतील.

त्यांनी सांगितले की, या देशातील ४० टक्के छोटे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळायला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना एमएसपीच माहीत नाही. 

भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत मधुरा म्हणाल्या, सरकार बदलल्याने खूप काही फरक पडू शकेल. शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार थेट मदत पाठवते, याकडे लक्ष वेधताच त्यांनी सागितले की, जी रक्कम पाठवली जाते, ती तुटपुंजी आहे.

आगामी काळात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करू शकाल काय, असे विचारता त्या म्हणाल्या, मुळीच नाही. पण या आंदोलनांना मदत करण्याची माझी भूमिका राहील. या पत्रपरिषदेस माकपचे सचिव कॉ. भगवान भोजने व सेल्वन डॅनियल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद