शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

विना तपासणीच १५ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणारे तीन वाहन निरीक्षक निलंबित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:13 IST

औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे.

औरंगाबाद : वाहनांची कोणतीही तपासणी न करता थेट योग्यता प्रमाण दिल्यावरून औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे. या कार्यालयात २०१५-१६ या वर्षात जवळपास १५ व्यावसायिक वाहनांना तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे आढळले होते. 

वाहनांची कठोर तपासणी करूनच योग्यता प्रमाण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये परिवहन विभागाला दिले होते. त्यानंतरही राज्यातील अनेक भागांत वाहनांना कुठलीही तपासणी न करता वाहनांना थेट योग्यता प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या पथकाने २० मार्च व १० एप्रिल २०१८ या काळात औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांच्या कामांची तपासणी केली.

यात जवळपास १५ व्यावसायिक वाहनांना कोणतीही तपासणी न करता थेट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले. या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका वाहन निरीक्षक योगिता अत्तरदे, किशोर पवार आणि हरीशकुमार पवार यांच्यावर ठेवण्यात आला. याचा अहवाल परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला. तो गृह विभागाच्या परिवहन विभागाला पाठविण्यात आला. या अहवालावर तात्काळ निर्णय घेण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद कार्यालयातील ३ वाहन निरीक्षकांसह राज्यातील ३७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. 

अधिक माहिती सांगता येणार नाही आपण वर्षभरापूर्वीच येथे रुजू झालो आहोत. त्यापूर्वीचे हे प्रकरण असून, याबाबत आपल्याला अधिक काही सांगता येणार नाही.- सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारsuspensionनिलंबन