शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चोर सोडून संन्यासाला सजा

By admin | Updated: June 13, 2014 01:12 IST

औरंगाबाद : पूर्वी मुबलक वीज उपलब्ध नसल्याने महावितरण भारनियमन करीत असे. आता वीज मुबलक प्रमाणात आहे;

औरंगाबाद : पूर्वी मुबलक वीज उपलब्ध नसल्याने महावितरण भारनियमन करीत असे. आता वीज मुबलक प्रमाणात आहे; मात्र वीजगळती व कोट्यवधीची थकबाकी असल्याने ग्रामीण भागात ६ ते ९ तासापर्यंत भारनियमन केले जात आहे. फिडरनुसार वीजगळती किती होते त्यानुसार भारनियमन केले जात असल्याने सरसकट त्या फिडरवरचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. या सामूहिक शिक्षेमुळे वीज बिल भरणाऱ्यांच्या घरातही अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी, वीज बिल न भरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महावितरणने उधारी बंद केली आहे. आता जे ग्राहक वीज बिल भरतील त्यांनाच वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पूर्वी एकाच वेळी संपूर्ण गावात भारनियमन केले जात असे; मात्र यामुळे जे प्रामाणिकपणे वीज भरतात त्यांच्यावर अन्याय होत असल्याने महावितरण मागील तीन वर्षांपासून फिडरनिहाय भारनियमन करत आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर वगळता जिल्ह्यामध्ये २ लाख ३१ हजार १६४ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी ५२ हजार ६८८ घरगुती ग्राहकांकडे १५ कोटी २० लाख रुपये थकले आहेत. २७९० व्यावसायिक ग्राहकांकडे २ कोटी ३ लाख व ५३४ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ६३ लाख, तसेच १ लाख ७३ हजार ९५६ ग्राहकांकडे ६८९ कोटी ५८ लाख रुपये थकले आहेत. याशिवाय पाणीपुरवठा करणाऱ्या ९१६ कार्यालयांकडे १६ कोटी १५ लाख रुपये असे एकूण ७१६ कोटी ६१ लाख रुपये थकबाकी निर्माण झाली आहे. वीजगळती व थकबाकीचा फुगलेला आकडा लक्षात घेता नियमित वीज भरणाऱ्यांची मानसिकता बदलत आहे. राज्यभरात फिडरनिहाय भारनियमन करण्यात येत आहे. ४२ ते ४५ टक्के वीजगळती, थकबाकी आहे अशा फिडरवर भारनियमन करण्यात येते; मात्र याच फिडरवर ग्राहकांना असेही कनेक्शन दिले आहेत, जे नियमित वीज बिल भरणा करतात. त्यांना बिल भरूनही भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. बिल भरूनही घरात ६ ते ९ तास अंधार असेल, तर बिल भरून काय फायदा असे म्हणत प्रामाणिक ग्राहकाचा कलही बिल न भरण्याकडे होत आहे. खाजगी कंपनीकडून एनर्जी आॅडिट करण्यात यावेफिडर असो की डीटीसी येथे बसविलेल्या मीटरमधून एनर्जी आॅडिट केले जाते. मात्र, हे आॅडिट महावितरणचे कर्मचारी करतात. वीजगळती व थकबाकीचा क्लेम आपल्यावर येऊ नये, या करिता आॅडिटमधून सत्य परिस्थिती बाहेर येत नाही. जर खाजगी कंपनीला एनर्जी आॅडिटचे काम दिले तर कोणत्या फिडर तसेच ट्रान्स्फार्मरमधून किती वीज गळती होते याची सूक्ष्मपणे तपासणी होईल. त्यातून सत्य आकडेवारी समोर येईल. तसेच ज्या ट्रान्स्फार्मरवरून गळती अधिक आहे. तिथील वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचेच विद्युत कनेक्शन तोडण्यात यावे, यामुळे प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होणार नाही. हेमंत कापडिया, ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग७२ फिडरवर भारनियमनऔरंगाबाद जिल्ह्यातील ९७ फिडरपैकी ७२ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. प्रत्येक फिडरवर एनर्जी मीटर लावण्यात आले आहे. तसेच त्या फिडरवरील प्रत्येक ट्रान्स्फॉर्मरवर डिस्ट्रिब्युशन ट्रान्स्फॉर्मर सेंटर (डीटीसी) बसविण्यात आले आहेत. याद्वारे ट्रान्स्फॉर्मरवरून केला गेलेला वीज पुरवठा व प्रत्यक्षात झालेला वापर व वसुली हे लक्षात घेतले जाते. ज्या फिडरवर ४२ ते ४५ टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती, वीजचोरी, थकबाकी आहे, अशा फिडरवर ६ ते ९ तासादरम्यान भारनियमन केले जाते. आठ तालुक्यातील ७२ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. या फिडरवरही नियमितपणे वीज बिल भरणारे ग्राहक आहेत; मात्र त्यांचा विचार महावितरण करीत नाही. कारण, सर्वजण काही वीज चोरी करीत नाहीत.