शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सुरेश धसांनी कराडची कुंडलीच काढली; किती फ्लॅट, किती जमिनी? चक्रावून टाकणारा आकडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:44 IST

वाल्मीक कराडने कुठे-कुठे आणि किती संपत्ती जमा केली आहे, याची यादीच यावेळी आमदार सुरेश धस यांनी वाचून दाखवली.

BJP Suresh Dhas: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात उपस्थितांना संबोधित कराताना भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या कारनाम्यांचा पाढा वाचला. धनंजय मुंडे यांच्या मदतीने वाल्मीक कराडने कुठे-कुठे आणि किती संपत्ती जमा केली आहे, याची यादीच यावेळी आमदार धस यांनी वाचून दाखवली.

सुरेश धस म्हणाले की, "जुने नवे थर्मल प्लँट्स, छोट्या-मोठ्या कंपन्यांकडून आका हप्ता घेत होता. कोरोमंडल नावाची सिमेंट कंपनी या खंडणीला वैतागून राज्यातून निघून गेली. परळीतील छोट्या आकांना २०२२ मध्ये ईडीची नोटीस आली आहे. ही नोटीस आली कारण, या आकाने माल काही कमी नाही जमवला. माजलगाव तालुक्यात एका व्यक्तीच्या नावावर आकाची ५० एकर जमीन आहे, माजलगाव तालुक्यातच काकडे नावाच्या कराडच्या वॉचमनच्या नावावर १५ ते २० एकर जमीन आहे, बार्शी तालुक्यात वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर ५० एकर जमीन आहे, मनीषा नरोटे नावाच्या महिलेच्या नावावर १० एकर जमीन आहे, जामखेड तालुक्यातील दिघोळला ज्योती जाधवांच्या नावावर १५ एकर जमीन आहे," असा दावा आमदार धस यांनी केला आहे.

"पुण्यातील वैशाली हॉटेलच्या मागे एका बिल्डरकडून वाल्मीक कराडने ७ आणि विष्णू चाटने १ असे एकूण ८ शॉप बुक केले आहेत. या एका शॉपची किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे, म्हणजे एकूण ४० कोटी रुपयांचे शॉप पाटील नावाच्या बिल्डरकडून घेण्यात आले आहेत. या बिल्डरला मी भेटलो. तो म्हणाला वाल्मीक कराडने ज्या बिल्डिंगमध्ये ८ शॉप घेतले आहेत त्या बिल्डिंगचे ३५ कोटी रुपयांचे टेरेसही तो मागत होता. मात्र मी ते दिले नाही. अॅमेनोरा पार्क, अन्ड्रोना टॉवर इथं एका फ्लॅटची किंमत १५ कोटी रुपये इतकी आहे. या टॉवरमध्ये वाल्मीक कराडने अख्खा फ्लोअरच विकत घेतला आहे. हा फ्लोअर कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. त्याची एकूण किंमत ७५ कोटी रुपये होते," असंही सुरेश धस यांनी सांगितलं आहे. 

"जमिनी आणि फ्लॅट या दोन संपत्तीतच वाल्मीक कराड १०० कोटी रुपयांच्या पुढे जात आहे. म्हणजे तो आपोआप ईडीच्या दरबारात जाणार आहे. कारण १०० कोटी रुपयांच्या पुढे गेलं की ते प्रकरण ईडीकडे जाते. वाल्मीक कराडने मावळ भागात गोरख दळवी आणि अनिल दळवी हे बापलेक ठेवले आहेत. त्या भागात काही विकायला निघालं की लगेच हे तिथं जातात. म्हणजे प्रत्येक भागात यांचे लोक आहेत. हा वाल्मीक कराड एखाद्या दिवशी अंबानींनाही मागे टाकतो की काय, अशी शंका माझ्या मनात येते," असा टोलाही सुरेश धस यांनी यावेळी लगावला आहे.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसwalmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे