शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

'सुपर संभाजीनगर'; स्मार्ट सिटीच्या नवीन फलकाने शहरात वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:25 IST

Controversy over the sign board in Aurangabad शहरातील प्रत्येक चौकाचे आणि परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्स्टॉलेशन फलक लावण्याचे काम स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे.

ठळक मुद्दे स्मार्ट सिटी सिडको एन-१ येथे ''लव्ह औरंगाबाद'' नावाने फलक लावला.खडकेश्वर भागात ''लव्ह खडकी'' नावाने बोर्ड लावण्यात आला. शनिवारी टीव्ही सेंटर चौकात ''सुपर संभाजीनगर'' या नावाने बोर्ड लावण्यात आला.

औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रशासनाने शनिवारी टीव्ही सेंटर चौकात ''सुपर संभाजीनगर'' या नावाने आर्ट इन्स्टॉलेशन फलक लावला. त्यामुळे शहरात नवीन वादाला सुरुवात झाली. शहराच्या नामांतराला सर्वोच्च न्यायालयापर्यंत विरोध करणाऱ्या मंडळींनी कडाडून विरोध सुरू केला आहे. मात्र, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व आरोपांचा इन्कार करीत शहराच्या पर्यटनवाढीसाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सध्या राबविण्यात येत आहेत. शहरातील प्रत्येक चौकाचे आणि परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्स्टॉलेशन फलक लावण्याचे काम स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे. आतापर्यंत स्मार्ट सिटी सिडको एन-१ येथे ''लव्ह औरंगाबाद'' नावाने फलक लावला. या फलकाचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. जालना रोड येथे ही अशाच पद्धतीचे फलक लावण्यात आले आहेत. खडकेश्वर भागात ''लव्ह खडकी'' नावाने बोर्ड लावण्यात आला. शनिवारी टीव्ही सेंटर चौकात ''सुपर संभाजीनगर'' या नावाने बोर्ड लावण्यात आला. सोशल मीडियावर हा बोर्ड झळकताच तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. रविवारी एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर या कृतीला कडाडून विरोध केला. शिवसेनेचे आ. अंबादास दानवे यांनी दुपारी समर्थन केले.''लव्ह औरंगाबाद'' ला आम्ही विरोध दर्शविला नाही. ''सुपर संभाजीनगर''ला विरोध कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मनपाकडून माहिती घेऊन बोलता येईल सध्या तरी याबाबत काही बोलता येणार नाही. महापालिकेकडून या प्रकरणात माहिती घेऊनच सांगता येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

कायदेशीर लढाई लढण्यास सज्ज१९९० च्या दशकात औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्कालीन शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारने काढलेली अधिसूचना मागे घेतली होती. आतापर्यंत स्मार्ट सिटी सारख्या प्रशासनाकडून अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर कायदेशीर लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत.- मुस्ताक अहमद, सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते.

शहराच्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्नस्मार्ट सिटी आणि खासगी संस्थेच्या सहकार्याने लावण्यात येत असलेल्या बोर्डवरून कोणताही वाद निर्माण झालेला नाही. शहराच्या वेगवेगळ्या भागात त्या परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन अशा पद्धतीचे बोर्ड तयार करण्यात येत आहेत. शहरात येणाऱ्या पर्यटकांना चांगले वाटावे, पर्यटन वाढावे, औरंगाबादकरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत.- आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी