शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

उन्हाळा वाढला, फळे स्वस्त; पण आरोग्यासाठी काय खायला हवे ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 27, 2024 18:59 IST

फळांचे दर स्थिर : आरोग्य- खिशालाही फायदेशीर

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. दुपारच्या वेळी तर उन्हाचा चटका जाणवत आहे. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी रसाळ फळांचा वापर वाढला आहे. त्यात सध्या रमजान महिना सुरू आहे. रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचे सेवन केले जात आहे. फळे स्वस्त असल्याने सर्वसामान्य जनताही ’दिल खोल के’ फळे खरेदी करीत आहेत.

तापमान ३८.८ अंशांवरदररोज तापमानात वाढ होत आहे. शनिवारी ३८.६ अंश तापमान नोंदवले गेले. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

उन्हाळ्यात कोणती फळे खायला हवी?१) टरबूज : टरबूजमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. यात फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी देखील असते. टरबूज खाल्लास घामामुळे गमावलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्यास मदत होते.२) आंबा : आंब्यामध्ये ८२ टक्क्यांपर्यंत पाणी असते. ते ॲन्टिऑक्सिडंट्सने भरलेले असते. आंबा खाल्ल्याने शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.३) संत्रा : संत्र्यामध्ये ८२ टक्के पाणी असते. हृदयाचे कार्य सुधारणे. शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आणि पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी प्रदान यासारखे अनेक फायदे संत्रा सेवनाने होतात.४) किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम यासाखरी खनिजे असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी किवी सेवन केले पाहिजे.

फळांचे दर काय?फळांचा प्रकार दर (प्रतिकिलो)१) टरबूज : २० ते २५ रुपये२) आंबे : १०० ते १५० रुपये३) चिकू : ५० ते ६०रुपये४) संत्री : ४० ते ५०रुपये५) खरबूज : ४० ते४५ रुपये६) पपई : ५० रुपये७) किवी : १०० रुपये (३ नग)

शहागंजमध्ये दररोज १० टन फळांची विक्रीफळांची मोठी बाजारपेठ शहागंज परिसर बनला आहे. रमजान महिना व उन्हाळ्याचे दिवस यामुळे येथे दररोज १० टन फळांची विक्री होते. रसाळ फळे रोजा (उपवास) सोडण्यासाठी सर्वाेत्तम आहेत. यामुळे फळांची मोठी विक्री होत आहे.- जुनेद खान, फळ वितरक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfruitsफळे