शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उन्हाळा वाढला, फळे स्वस्त; पण आरोग्यासाठी काय खायला हवे ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 27, 2024 18:59 IST

फळांचे दर स्थिर : आरोग्य- खिशालाही फायदेशीर

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. दुपारच्या वेळी तर उन्हाचा चटका जाणवत आहे. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी रसाळ फळांचा वापर वाढला आहे. त्यात सध्या रमजान महिना सुरू आहे. रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचे सेवन केले जात आहे. फळे स्वस्त असल्याने सर्वसामान्य जनताही ’दिल खोल के’ फळे खरेदी करीत आहेत.

तापमान ३८.८ अंशांवरदररोज तापमानात वाढ होत आहे. शनिवारी ३८.६ अंश तापमान नोंदवले गेले. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

उन्हाळ्यात कोणती फळे खायला हवी?१) टरबूज : टरबूजमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. यात फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी देखील असते. टरबूज खाल्लास घामामुळे गमावलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्यास मदत होते.२) आंबा : आंब्यामध्ये ८२ टक्क्यांपर्यंत पाणी असते. ते ॲन्टिऑक्सिडंट्सने भरलेले असते. आंबा खाल्ल्याने शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.३) संत्रा : संत्र्यामध्ये ८२ टक्के पाणी असते. हृदयाचे कार्य सुधारणे. शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आणि पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी प्रदान यासारखे अनेक फायदे संत्रा सेवनाने होतात.४) किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम यासाखरी खनिजे असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी किवी सेवन केले पाहिजे.

फळांचे दर काय?फळांचा प्रकार दर (प्रतिकिलो)१) टरबूज : २० ते २५ रुपये२) आंबे : १०० ते १५० रुपये३) चिकू : ५० ते ६०रुपये४) संत्री : ४० ते ५०रुपये५) खरबूज : ४० ते४५ रुपये६) पपई : ५० रुपये७) किवी : १०० रुपये (३ नग)

शहागंजमध्ये दररोज १० टन फळांची विक्रीफळांची मोठी बाजारपेठ शहागंज परिसर बनला आहे. रमजान महिना व उन्हाळ्याचे दिवस यामुळे येथे दररोज १० टन फळांची विक्री होते. रसाळ फळे रोजा (उपवास) सोडण्यासाठी सर्वाेत्तम आहेत. यामुळे फळांची मोठी विक्री होत आहे.- जुनेद खान, फळ वितरक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfruitsफळे