शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

उन्हाळा वाढला, फळे स्वस्त; पण आरोग्यासाठी काय खायला हवे ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 27, 2024 18:59 IST

फळांचे दर स्थिर : आरोग्य- खिशालाही फायदेशीर

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. दुपारच्या वेळी तर उन्हाचा चटका जाणवत आहे. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी रसाळ फळांचा वापर वाढला आहे. त्यात सध्या रमजान महिना सुरू आहे. रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचे सेवन केले जात आहे. फळे स्वस्त असल्याने सर्वसामान्य जनताही ’दिल खोल के’ फळे खरेदी करीत आहेत.

तापमान ३८.८ अंशांवरदररोज तापमानात वाढ होत आहे. शनिवारी ३८.६ अंश तापमान नोंदवले गेले. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

उन्हाळ्यात कोणती फळे खायला हवी?१) टरबूज : टरबूजमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. यात फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी देखील असते. टरबूज खाल्लास घामामुळे गमावलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्यास मदत होते.२) आंबा : आंब्यामध्ये ८२ टक्क्यांपर्यंत पाणी असते. ते ॲन्टिऑक्सिडंट्सने भरलेले असते. आंबा खाल्ल्याने शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.३) संत्रा : संत्र्यामध्ये ८२ टक्के पाणी असते. हृदयाचे कार्य सुधारणे. शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आणि पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी प्रदान यासारखे अनेक फायदे संत्रा सेवनाने होतात.४) किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम यासाखरी खनिजे असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी किवी सेवन केले पाहिजे.

फळांचे दर काय?फळांचा प्रकार दर (प्रतिकिलो)१) टरबूज : २० ते २५ रुपये२) आंबे : १०० ते १५० रुपये३) चिकू : ५० ते ६०रुपये४) संत्री : ४० ते ५०रुपये५) खरबूज : ४० ते४५ रुपये६) पपई : ५० रुपये७) किवी : १०० रुपये (३ नग)

शहागंजमध्ये दररोज १० टन फळांची विक्रीफळांची मोठी बाजारपेठ शहागंज परिसर बनला आहे. रमजान महिना व उन्हाळ्याचे दिवस यामुळे येथे दररोज १० टन फळांची विक्री होते. रसाळ फळे रोजा (उपवास) सोडण्यासाठी सर्वाेत्तम आहेत. यामुळे फळांची मोठी विक्री होत आहे.- जुनेद खान, फळ वितरक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfruitsफळे