शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

सोयगावात आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:49 IST

अतिवृष्टीने शेतातील सर्व पिक वाया गेले.

ठळक मुद्देपिक लागवडीचा खर्च देखील निघाला नाही

सोयगाव : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतीसाठी झालेला खर्च आणि  डोक्यावर कर्जाचा भार यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी किन्ही येथे उघडकीस आली. विजेंद्र (उर्फ सोनू ) सुरेश देशमुख (३०) असे मुराताचे नाव असून शेतीत उत्पन्नच नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे कसा चालवायचा या चिंतेत त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. 

तालुक्यातील किन्ही येथील लताबाई सुरेश देशमुख यांची गट नं.३५ मध्ये दोन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले आहेत. यातील विजेंद्र हा घरातील कर्ता पुरूष होता. त्याने या वर्षी कपाशी व आरबी पिकांची शेतात लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीने शेतातील सर्व पिक वाया गेले. लागवड  केलेला खर्च सुद्धा निघाला नाही, तसेच कर्जमाफीमध्ये नावही आले नाही. यातच आईचे आजरपण, शेतीसाठी लागलेला पैसा, डोक्यावर कर्जाचा बोजा यातून उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत ते होते. 

शनिवारी सकाळी विजेंद्र शेतात गुरांना घेऊन गेला. येथेच त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. यानंतर शेजारील शेतकरी प्रविण जैन तेथे आले आता त्यांना विजेंद्र अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ विजेंद्रच्या नातेवाईकांना सोबत घेऊन बनोटी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून विजेंद्र मृत झाल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी कृष्णा घावटे यांनी उत्तरीय तपासणी केली. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबाद