शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

सोयगावात आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:49 IST

अतिवृष्टीने शेतातील सर्व पिक वाया गेले.

ठळक मुद्देपिक लागवडीचा खर्च देखील निघाला नाही

सोयगाव : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतीसाठी झालेला खर्च आणि  डोक्यावर कर्जाचा भार यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी किन्ही येथे उघडकीस आली. विजेंद्र (उर्फ सोनू ) सुरेश देशमुख (३०) असे मुराताचे नाव असून शेतीत उत्पन्नच नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे कसा चालवायचा या चिंतेत त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. 

तालुक्यातील किन्ही येथील लताबाई सुरेश देशमुख यांची गट नं.३५ मध्ये दोन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले आहेत. यातील विजेंद्र हा घरातील कर्ता पुरूष होता. त्याने या वर्षी कपाशी व आरबी पिकांची शेतात लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीने शेतातील सर्व पिक वाया गेले. लागवड  केलेला खर्च सुद्धा निघाला नाही, तसेच कर्जमाफीमध्ये नावही आले नाही. यातच आईचे आजरपण, शेतीसाठी लागलेला पैसा, डोक्यावर कर्जाचा बोजा यातून उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत ते होते. 

शनिवारी सकाळी विजेंद्र शेतात गुरांना घेऊन गेला. येथेच त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. यानंतर शेजारील शेतकरी प्रविण जैन तेथे आले आता त्यांना विजेंद्र अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ विजेंद्रच्या नातेवाईकांना सोबत घेऊन बनोटी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून विजेंद्र मृत झाल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी कृष्णा घावटे यांनी उत्तरीय तपासणी केली. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबाद