शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कारखानदारांनो, आमचा ऊस घ्या हो ऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:23 AM

यावर्षी जवळपास सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कायगावातील उसाची मागणी घटली आहे. दरवर्षी कायगाव परिसरात ऊस खरेदीसाठी राज्यभरातील कारखानदारांमध्ये चढाओढ दिसून येत होती. मात्र, यावर्षी येथील बळीराजावर ‘ऊस घ्या हो ऊस!’ असे कारखानदारांना म्हणण्याची वेळ आली आहे.

तारेख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : यावर्षी जवळपास सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कायगावातील उसाची मागणी घटली आहे. दरवर्षी कायगाव परिसरात ऊस खरेदीसाठी राज्यभरातील कारखानदारांमध्ये चढाओढ दिसून येत होती. मात्र, यावर्षी येथील बळीराजावर ‘ऊस घ्या हो ऊस!’ असे कारखानदारांना म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, कारखानदार प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे.गोदावरी नदीकाठी असलेले कायगाव, जुने कायगाव, लखमापूर, अंमळनेर, गणेशवाडी, पखोरा, भेंडाळा, धनगरपट्टी, अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब आदी भागांत सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टर ऊस दरवर्षी उपलब्ध असतो. यंदाही चांगला पाऊस पडल्याने या भागात सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होता. मागच्या वर्षी याच ३ लाख मेट्रिक टन उसावर अनेक साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम कडेस नेले होते.गतवर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि उसाच्या कमतरतेच्या गेल्या हंगामात अनेक साखर कारखान्यांनी कायगाव भागातील ऊस उत्पादक शेतकºयांची मनधरणी केली होती. मात्र, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे चित्र पालटले आहे. कायगाव परिसरातील शेतकºयांवरच कारखानदारांची उसासाठी मनधरणी करण्याची वेळ आली आहे.कायगाव परिसरात उसाच्या हंगामाच्या सुरुवातीला एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील किमान १५ आणि इतर जिल्ह्यांतील ५ ते ६, अशा २० हून अधिक खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी कार्यालये सुरू केली होती. मात्र, जसजसा हंगाम पुढे गेला तसतसे कारखान्यांनी या भागवरचे लक्ष कमी केले. पुढे परिस्थिती एवढी बिकट झाली, की ऊस उत्पादक शेतकºयांना आपला ऊस कारखान्याला देण्यासाठी कारखान्याच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागले. काही भागात तर ऊस उत्पादक शेतकºयांना स्वत:च मजुरांची व्यवस्था करून ऊस तोडून कारखान्यात नेऊन टाकावा लागला आहे. आजही या भागात तोडणीअभावी शेतात ऊस उभा आहेउसाच्या मोबदल्यासाठी फरपटहंगामाच्या सुरुवातीला शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी साखर कारखानदारांशी उसाच्या दरासंदर्भात मोठा संघर्ष केला. मात्र, तरीही शेतकºयांच्या पदरात फारसे काही पडले नाही. अगोदर जाहीर केल्याप्रमाणे काही साखर कारखान्यांनी एका मस्टरचे पेमेंट काढले. मात्र, यावर्षी साखरेचा भाव हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उतरला.४त्यामुळे साखर कारखानदारांनी पेमेंट देण्यात हात आखडला आहे. सुरुवातीला काही जणांनी २,३०० रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे पेमेंट दिले. मात्र, नंतरचे पेमेंट २,००० रुपयांप्रमाणे काढण्यात आले. त्यातही बहुतांश साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरनंतरचे उसाचे बिल थकविल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.