शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:06 AM

कायगाव : सोयाबीन पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गळनिंब, अगरवडगाव आणि भिवधानोरा या तिन्ही गावांत उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी उत्पादन ...

कायगाव : सोयाबीन पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गळनिंब, अगरवडगाव आणि भिवधानोरा या तिन्ही गावांत उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी उत्पादन घेण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदा परिसरातील जवळपास ५० एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झालेली आहे. आता काही उन्हाळी सोयाबीन पिकांची काढणी पूर्ण झाली असून, काही पिके काढणीसाठी तयार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पीक तयार झाले असून, त्यांना एकरी ९ ते १० क्विंटल सरासरी उत्पादन मिळाले आहे. तसेच उर्वरित क्षेत्रांतसुद्धा एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. कृषी विभागाने गेल्या हंगामातच पुढील हंगामात लागणारे बियाणे स्वतः तयार करण्याचे केलेले नियोजन या शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक सफल केले आहे. उन्हाळी पिकांमुळे परिसरातील चालू खरीप हंगामातील सोयाबीन बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हेच बियाणे शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी वापरता येणार आहे.

चौकट

कृषी विभागाच्या पथकाची भेट

शुक्रवारी अगरवाडगाव येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी पांडुरंग वाघ यांच्या सोयाबीनच्या क्षेत्राची तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी पाहणी केली. उन्हाळी सोयाबीन पीक पद्धतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी तारगे यांच्या उपस्थितीत खरीप पूर्व नियोजनबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक व्ही. ए. घोडके, कृषी सहायक मनीषा तागड, शेतकरी प्रवीण बोकडीया, पांडुरंग वाघ, पंढरी वाघ, बाळासाहेब वाघ, जगन्नाथ औटे, नानासाहेब म्हसरूप, रामेश्वर वाघ, अरुण खैरे, किशोर वाघ, निखिल गायकवाड, किशोर केरे, आदी शेतकरी हजर होते.

फोटो :

धनगरपट्टी शिवारात शुक्रवारी उन्हाळी सोयाबीन पिकांची पाहणी करताना.

070521\tarekh ahemad usuf shaikh_img-20210506-wa0033_1.jpg

धनगरपट्टी शिवारात शुक्रवारी उन्हाळी सोयाबीन पिकांची पाहणी करतांना.