शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

अळ्यायुक्त दह्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या !

By admin | Updated: April 20, 2015 00:31 IST

उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात देण्यात आलेल्या दह्यामध्ये अळ्या निघाल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली होती.

उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात देण्यात आलेल्या दह्यामध्ये अळ्या निघाल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली होती. हे दही काही विद्यार्थ्यांच्या खाण्यामध्ये आले होते. यापैकी दोघांना जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सुरू करण्यात आले. येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवणासोबतच अन्य सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. यासाठी शासन वर्षाकाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. परंतु, प्रशासनाच्या संवेदनाहीन धोरणामुळे शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम होत आहे. वसतीगृहातील विद्यार्थी जेवणाबाबत वारंवार तक्रारी करीत आहेत. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ नोटिसांचा खेळ मांडला आहे. काही तक्रार आली की पंचानामा करायचा आणि संबंधित भोजन पुरवठादारास व कर्मचाऱ्यास नोटीस देवून मोकळे व्हायचे, हेच धोरण मागील अनेक महिन्यांपासून अवलंबिले आहे. कुठल्याही स्वरूपाची ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारही अधिकाऱ्यांच्या या नोटिसांना भिक घालत नसल्याचे समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी ठेकेदाराला १९ एप्रिल रोजी दिलेल्या नोटिसेतून समोर आले आहे.प्रशासनाच्या या बोटचेप्या धोरणामुळेच ठेकेदारही फारसे गंभीर होत नसल्याने हे प्रकार सातत्याने घडत आहेत. समाजकल्याण विभागाकडे तक्रारी करूनही काहीच फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून कैफियत मांडली. त्यावर तपासणीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांची नियुक्ती करून १७ एप्रिल रोजी तपासणी केली. हे पथक सर्व चौकशी करून आल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांच्या जेवणातील दह्यामध्ये अळ्या निघाल्या. या अळ्या एका विद्यार्थ्याच्या नजरेस आल्या. तोवर दोन ते तीन विद्यार्थ्यांनी हे दही खालले होते. यापैकी बामणी येथील सुदर्शन सिरस या विद्यार्थ्यास काही वेळानंतर जुलाब, उलट्यांचा त्रास होवू लागल्यानंतर त्यास जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास अविनाश शिवाजी कांबळे या विद्यार्थ्याला जुलाब, उलट्यांचा त्रास होवू लागल्याने त्यालाही रूग्णालयात भरती करण्यात आहे. या दोघांवरही उपचार सुरू आहेत. त्यांची पकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या गलथान कारभाराबाबत पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) लग्नातील शिल्लक राहिलेली भाजी खाण्यासाठी दिली, फळेही निकृष्ट दर्जाची दिली, मांसाहार चांगल्या दर्जाचा नसतो, दूधही भेसळयुक्त असते, अशा एक ना अनेक तक्रारी हे विद्यार्थी अधिकाऱ्यांकडे करतात. परंतु, आजवर नोटिसा बजावण्यापलिकडे प्रशासनाने काही केलेले नाही. त्यामुळेच संबंधित ठेकेदाराला नेमके कोणाचे अभय आहे? असा प्रश्न आता पालकांतून उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिविताशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे हात का कच खात आहेत? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत.