शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

विद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिंनीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे गुरुवारी सकाळी विद्यार्थिनींच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी कुलगुरू निवासस्थानासमोर हंडे, बकेट घेऊन रास्ता रोको केला. शेवटी विद्यार्थी विकास संचालक डॉ़  मुस्तजीब खान यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

विद्यापीठात मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविषयी ‘लोकमत’मध्ये १७ एप्रिल रोजी ‘अधिकाऱ्यांना जार विद्यार्थी बेजार’ या मथळ्याखाली या प्रश्नाला वाचा फोडली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यावर कोणताही तोडगा काढला नाही. विद्यापीठात मुला-मुलींची प्रत्येकी बारा वसतिगृहे आहेत़  यात ५०० मुले आणि ८०० मुली राहतात़  मागील दहा दिवसांपासून रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात पाण्याचा ठणठणाट आहे़  यासंदर्भात तक्रार करूनही पाणी उपलब्ध झाले नाही़  गुरुवारी पाण्याचा एक थेंबही वसतिगृहातील विद्यार्थिनींना मिळाला नाही़ त्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी  सकाळी ८ वाजता हातात बकेट, हंडे घेऊन थेट कुलगुरू डॉ़  बी़  ए़  चोपडे यांचे निवासस्थान गाठले़  मात्र, डॉ. चोपडे हे मुंबईला गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.

यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले़  सकाळी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी कामावर येत होते़; परंतु विद्यार्थिनींच्या रास्ता रोकोमुळे त्यांना रस्त्यावरच ताटकळावे लागले़  आंदोलनाची माहिती विद्यार्थी विकास कल्याणचे संचालक डॉ़  मुस्तजीब खान यांना मिळताच त्यांनी विद्यार्थिनींची भेट घेतली़  त्यांच्या समस्या जाणून घेऊन रमाबाई आंबेडकर वसतिगृह, यशवंतराव चव्हाण वसतिगृहाची पाहणी केली़  पाहणीदरम्यान त्यांनी साफसफाईचा आढावा घेऊन विद्यार्थिनींना पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले़  यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले़; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांना पाणी मिळालेले नव्हते़  आंदोलनात कोमल मोरे, श्रद्धा खरात, रूपाली सावे, आरती अचलखांब, किशोरी वैद्य, रेखा साळवे, रोशनी टाकणकर, आरती अंभोरे, मनीषा मगरे आदींनी सहभाग नोंदविला़.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादwater shortageपाणीकपातStudentविद्यार्थीagitationआंदोलन