शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिंनीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे गुरुवारी सकाळी विद्यार्थिनींच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी कुलगुरू निवासस्थानासमोर हंडे, बकेट घेऊन रास्ता रोको केला. शेवटी विद्यार्थी विकास संचालक डॉ़  मुस्तजीब खान यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

विद्यापीठात मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविषयी ‘लोकमत’मध्ये १७ एप्रिल रोजी ‘अधिकाऱ्यांना जार विद्यार्थी बेजार’ या मथळ्याखाली या प्रश्नाला वाचा फोडली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यावर कोणताही तोडगा काढला नाही. विद्यापीठात मुला-मुलींची प्रत्येकी बारा वसतिगृहे आहेत़  यात ५०० मुले आणि ८०० मुली राहतात़  मागील दहा दिवसांपासून रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात पाण्याचा ठणठणाट आहे़  यासंदर्भात तक्रार करूनही पाणी उपलब्ध झाले नाही़  गुरुवारी पाण्याचा एक थेंबही वसतिगृहातील विद्यार्थिनींना मिळाला नाही़ त्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी  सकाळी ८ वाजता हातात बकेट, हंडे घेऊन थेट कुलगुरू डॉ़  बी़  ए़  चोपडे यांचे निवासस्थान गाठले़  मात्र, डॉ. चोपडे हे मुंबईला गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.

यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले़  सकाळी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी कामावर येत होते़; परंतु विद्यार्थिनींच्या रास्ता रोकोमुळे त्यांना रस्त्यावरच ताटकळावे लागले़  आंदोलनाची माहिती विद्यार्थी विकास कल्याणचे संचालक डॉ़  मुस्तजीब खान यांना मिळताच त्यांनी विद्यार्थिनींची भेट घेतली़  त्यांच्या समस्या जाणून घेऊन रमाबाई आंबेडकर वसतिगृह, यशवंतराव चव्हाण वसतिगृहाची पाहणी केली़  पाहणीदरम्यान त्यांनी साफसफाईचा आढावा घेऊन विद्यार्थिनींना पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले़  यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले़; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांना पाणी मिळालेले नव्हते़  आंदोलनात कोमल मोरे, श्रद्धा खरात, रूपाली सावे, आरती अचलखांब, किशोरी वैद्य, रेखा साळवे, रोशनी टाकणकर, आरती अंभोरे, मनीषा मगरे आदींनी सहभाग नोंदविला़.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादwater shortageपाणीकपातStudentविद्यार्थीagitationआंदोलन