शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिंनीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विद्यार्थी वसतिगृहांमध्ये मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे गुरुवारी सकाळी विद्यार्थिनींच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी कुलगुरू निवासस्थानासमोर हंडे, बकेट घेऊन रास्ता रोको केला. शेवटी विद्यार्थी विकास संचालक डॉ़  मुस्तजीब खान यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

विद्यापीठात मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविषयी ‘लोकमत’मध्ये १७ एप्रिल रोजी ‘अधिकाऱ्यांना जार विद्यार्थी बेजार’ या मथळ्याखाली या प्रश्नाला वाचा फोडली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यावर कोणताही तोडगा काढला नाही. विद्यापीठात मुला-मुलींची प्रत्येकी बारा वसतिगृहे आहेत़  यात ५०० मुले आणि ८०० मुली राहतात़  मागील दहा दिवसांपासून रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात पाण्याचा ठणठणाट आहे़  यासंदर्भात तक्रार करूनही पाणी उपलब्ध झाले नाही़  गुरुवारी पाण्याचा एक थेंबही वसतिगृहातील विद्यार्थिनींना मिळाला नाही़ त्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी  सकाळी ८ वाजता हातात बकेट, हंडे घेऊन थेट कुलगुरू डॉ़  बी़  ए़  चोपडे यांचे निवासस्थान गाठले़  मात्र, डॉ. चोपडे हे मुंबईला गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.

यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले़  सकाळी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी कामावर येत होते़; परंतु विद्यार्थिनींच्या रास्ता रोकोमुळे त्यांना रस्त्यावरच ताटकळावे लागले़  आंदोलनाची माहिती विद्यार्थी विकास कल्याणचे संचालक डॉ़  मुस्तजीब खान यांना मिळताच त्यांनी विद्यार्थिनींची भेट घेतली़  त्यांच्या समस्या जाणून घेऊन रमाबाई आंबेडकर वसतिगृह, यशवंतराव चव्हाण वसतिगृहाची पाहणी केली़  पाहणीदरम्यान त्यांनी साफसफाईचा आढावा घेऊन विद्यार्थिनींना पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले़  यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले़; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांना पाणी मिळालेले नव्हते़  आंदोलनात कोमल मोरे, श्रद्धा खरात, रूपाली सावे, आरती अचलखांब, किशोरी वैद्य, रेखा साळवे, रोशनी टाकणकर, आरती अंभोरे, मनीषा मगरे आदींनी सहभाग नोंदविला़.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादwater shortageपाणीकपातStudentविद्यार्थीagitationआंदोलन