शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

नव्या क्षितिजाच्या शोधात विद्यार्थी लातुरात़़!

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

लातूर : ध्येयाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थीमित्रांनी आताशी कुठे एक ‘माईलस्टोन’ गाठले आहे़

लातूर : ध्येयाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थीमित्रांनी आताशी कुठे एक ‘माईलस्टोन’ गाठले आहे़ दहावीच्या निकालात उत्तुंग भरारी घेऊन ते आता क्षितिजाच्या दिशेने झेपावण्यास सज्ज झाले आहेत़ निकालानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांचीही पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरु झाली आहे़ दहावीनंतर साधारणत: अकरावीलाच प्रवेश घेण्याचा अनेकांचा कल असतो़ आयटीआय, तंत्रनिकेतन, कृषी तंत्र पदविका हे पर्यायही विद्यार्थ्यांसमोर खुले आहेत़ बारावी परीक्षेच्या ‘लातूर पॅटर्न’चा गवगवा राज्यभरात झालेला आहे़ त्यामुळे निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून लातुरात प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थी-पालकांची गर्दी झाली़ राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय तसेच अहमदपुरातील महात्मा गांधी महाविद्यालयात अकरावीचा प्रवेश अर्ज खरेदी करण्यासाठी रांगा लागल्या होत्या़ सांगली, सातारा, बुलढाणा, मुंबई, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, यवतमाळ अशा दूरदूरच्या जिल्ह्यातून पालक विद्यार्थ्यांसमवेत स्वत: हजर झाले होते़ जिल्ह्यात अकरावीच्या ४१,५६० जागा उपलब्ध आहेत़ त्यापैकी १६,६०० जागा विज्ञान शाखेच्या आहेत़ कला शाखेच्या १८,९२० तर वाणिज्य शाखेच्या ३२८० जागा प्रवेशक्षम आहेत़विज्ञानसाठी गांधी, शाहू, दयानंदमध्ये गर्दी‘लातूर पॅटर्न’मुळे लातुरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी मोठी गर्दी होते़ बुधवारी पहिल्याच दिवशी जवळपास २ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून २९०० अर्ज विक्रीस गेले़ येथे ४८० अनुदानित तर २४० विनाअनुदानित जागा आहेत़ २१ जूनपर्यंत नोंदणी होणार असून, २३ जून रोजी चेकलिस्ट लागेल़ २४ जूनला पहिली निवड यादी जाहीर होईल़ या यादीतील प्रवेश २४ व २५ रोजी होतील़ २६ ला दुसरी यादी व प्रवेश २६, २७ रोजी होतील़ २८ ला अंतिम निवड यादी जाहीर होईल़दयानंद महाविद्यालयबारावी परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयानेही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे़ येथेही बुधवारी प्रवेश नोंदणीसाठी रांगा लागल्या होत्या़ दिवसभरात १४४० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून जवळपास ३ हजार अर्जांची विक्री झाली आहे़ महाविद्यालयात अनुदानित ७२० व विनाअनुदानित ७२० जागा आहेत़ २८ जूनपर्यंत नोंदणी चालणार आहे़ २९ जून रोजी चेकलिस्ट लागणार आहे़ ३० जून रोजी पहिली प्रवेश यादी जाहीर होईल़ ३ व ४ जुलै रोजी अनुक्रमे दुसरी व तिसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे़महात्मा गांधी महाविद्यालयबारावीच्या निकालात अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयाने आपला दबदबा राखला आहे़ बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून येथे ७२० जागा उपलब्ध आहेत़ २८ जूनपर्यंत नोंदणी होईल़ ३० जून रोजी निवड यादी लागणार असून १ ते ३ जुलै रोजी प्रवेश होतील़ ४ जुलै रोजी पहिली प्रतीक्षा यादी लागणार असून त्याचे प्रवेश ५ ते ७ जुलै रोजी होतील़ दुसरी प्रतिक्षा यादी ८ जुलै रोजी लागून ९ व १० जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया चालेल़ अपंग, आजी-माजी सैनिक, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक, बदली प्रवर्गातील प्रवेश १२ जुलै रोजी होणार आहेत़इतरही 8000 पर्याय़़़अकरावीचा आॅप्शन ड्रॉप करणाऱ्या अनेकांची पसंती तंत्रनिकेतनला आहे़ जिल्ह्यात जवळपास १७ तंत्रनिकेतन महाविद्यालये असून त्यात ५४०० जागा उपलब्ध आहेत़ प्रवेश प्रक्रिया आठवडाभरात सुरु होण्याची शक्यता़दहावीनंतर आयटीआय करु इच्छिणाऱ्यांसाठी ३५ ट्रेड असून २३०० जागा उपलब्ध आहेत़ प्रत्येक तालुक्यास शासकीय आयटीआयची सोय आहे़ सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे़कृषी तंत्र पदविकेचीही संधी दहावीनंतर उपलब्ध आहे़ जिल्ह्यात १ शासकीय व ७ खाजगी विद्यालये आहेत़ त्यातून ४८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल़ प्रवेश प्रक्रिया २५ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस आॅनलाईन प्रारंभ़आयटीआयप्रमाणेच तंत्र प्रशालेत इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आॅटो इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी असे ३ स्वतंत्र ट्रेड आहेत़ या ट्रेडच्या प्रत्येकी २० प्रमाणे केवळ ६० जागा आहेत़ प्रवेश प्रक्रिया २६ जूनपासून सुरु होतेय़्दहावीनंतर एचएससी व्होकेशनलचाही (एमसीव्हीसी) पर्याय आहे़ जिल्ह्यात ६० महाविद्यालयांतून ४०४० जागा उपलब्ध आहेत़ प्रवेश थेट जागेवरच देण्याची प्रक्रिया निकालानंतर लगेच सुरु झाली आहे़प्रवेश प्रक्रियेत आरक्षण़़़अकरावीसाठी स्वजिल्हा 70 टक्के; परजिल्हा ३० टक्केअनुसूचित जमाती 07%विशेष मागासवर्गीय 02%विमुक्त जाती (अ) 03%भटक्या जमाती1 (ब) 2.5%भटक्या जमाती2 (क) 3.5%भटक्या जमाती3 (ड) 02%