शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:57 IST

राज्य शासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरू केली आहे. यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही केला आहे.

ठळक मुद्देमहाभरती : पारदर्शक कारभाराचा अभाव; तक्रारींची दखल घेईनात

औरंगाबाद : राज्य शासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरू केली आहे. यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही केला आहे.राज्य शासनाने तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, आरोग्य विभाग, एमआयडीसी, अभियांत्रिकी, महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांची भरती ई-महापोर्टलच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली आहे. २ ते २८ जुलैदरम्यान तलाठी पदासाठी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत एका विद्यार्थ्यास एकदाच परीक्षा देण्याची संधी देण्याची घोषणा पदांच्या जाहिरातीमध्येच करण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांनी ई- मेल बदलून पाच ते सहा वेळा परीक्षा दिल्याची माहिती स्पर्धक विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला भेट देऊन दिली. याविषयी विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे तक्रार केली असता, त्यांना कोणताही प्रतिसाद देण्यात येत नाही. तलाठी पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिलेली नसल्याचे टोल फ्री क्रमांकावर सांगण्यात येत असल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले. या पोर्टलच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, संबंधित विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती विचारून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी आपले नुकसान होईल, या भीतीपोटी तक्रार करण्यास घाबरत आहेत. याविषयी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने महापरीक्षेच्या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधला असता, त्यांनी परीक्षार्थी नसल्यामुळे कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच महापरीक्षा पोर्टल कोणत्या विभागाच्या नियंत्रणात चालविण्यात येते? पोर्टलचे संचालक कोण? परीक्षा घेण्यासाठी कोणती एजन्सी नेमली? आदीविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दर्शविला. महापरीक्षाचे आयटी हेड कुलदीप चतुर्वेदी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. संदेश पाठवूनही उत्तर दिले नाही.चौकटतलाठी भरतीमध्ये गैरव्यवहाराचा संशय?तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया औरंगाबाद, पुण्यातील युवकांमध्ये व्यक्त केला जात आहे. ई-महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षेमध्ये पारदर्शकतेच्या अभावामुळे या संशयाला अधिक बळकटी मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. तलाठी पदाच्या एका जागेवर निवड करण्यासाठी २० लाख रुपये काही मध्यस्थ घेत असल्याची कुजबुज सुरू आहे. परंतु कुणीही समोर येत नाही.-----

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीEmployeeकर्मचारी