शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:57 IST

राज्य शासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरू केली आहे. यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही केला आहे.

ठळक मुद्देमहाभरती : पारदर्शक कारभाराचा अभाव; तक्रारींची दखल घेईनात

औरंगाबाद : राज्य शासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरू केली आहे. यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही केला आहे.राज्य शासनाने तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, आरोग्य विभाग, एमआयडीसी, अभियांत्रिकी, महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांची भरती ई-महापोर्टलच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली आहे. २ ते २८ जुलैदरम्यान तलाठी पदासाठी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत एका विद्यार्थ्यास एकदाच परीक्षा देण्याची संधी देण्याची घोषणा पदांच्या जाहिरातीमध्येच करण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांनी ई- मेल बदलून पाच ते सहा वेळा परीक्षा दिल्याची माहिती स्पर्धक विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला भेट देऊन दिली. याविषयी विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे तक्रार केली असता, त्यांना कोणताही प्रतिसाद देण्यात येत नाही. तलाठी पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिलेली नसल्याचे टोल फ्री क्रमांकावर सांगण्यात येत असल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले. या पोर्टलच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, संबंधित विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती विचारून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी आपले नुकसान होईल, या भीतीपोटी तक्रार करण्यास घाबरत आहेत. याविषयी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने महापरीक्षेच्या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधला असता, त्यांनी परीक्षार्थी नसल्यामुळे कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच महापरीक्षा पोर्टल कोणत्या विभागाच्या नियंत्रणात चालविण्यात येते? पोर्टलचे संचालक कोण? परीक्षा घेण्यासाठी कोणती एजन्सी नेमली? आदीविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दर्शविला. महापरीक्षाचे आयटी हेड कुलदीप चतुर्वेदी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. संदेश पाठवूनही उत्तर दिले नाही.चौकटतलाठी भरतीमध्ये गैरव्यवहाराचा संशय?तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया औरंगाबाद, पुण्यातील युवकांमध्ये व्यक्त केला जात आहे. ई-महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षेमध्ये पारदर्शकतेच्या अभावामुळे या संशयाला अधिक बळकटी मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. तलाठी पदाच्या एका जागेवर निवड करण्यासाठी २० लाख रुपये काही मध्यस्थ घेत असल्याची कुजबुज सुरू आहे. परंतु कुणीही समोर येत नाही.-----

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीEmployeeकर्मचारी