शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गरज; मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:05 IST

दप्तराच्या ओझ्याखाली झुकलेली बालके आणि मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आई- वडिलांनीच घेतलेले गृहपाठाचे ‘टेन्शन’ असे चित्र आज अत्यंत सामान्य झाले आहे.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : दप्तराच्या ओझ्याखाली झुकलेली बालके आणि मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आई- वडिलांनीच घेतलेले गृहपाठाचे ‘टेन्शन’ असे चित्र आज अत्यंत सामान्य झाले आहे. स्पर्धेच्या युगात मुलांना पळविताना मुलांच्या क्षमता, त्यांचे वय या गोष्टींचा विचार ना पालक करतात ना शिक्षण संस्था करतात, अशा पालकांना आणि शिक्षकांना दणका देणारा आणि मुलांसाठी सुखावह असणारा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने घेतला असून, या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सीबीएसई शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, मुलांच्या दप्तराच्या ओझ्यावर राज्य सरकारने कटाक्ष ठेवावा आणि या गोष्टींवर केंद्र सरकारने बारकाईने लक्ष द्यावे, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. 

इयत्ता दुसरीपर्यंत गृहपाठ देण्यात येऊ नये आणि इयत्ता तिसरीमध्ये आठवड्यातून दोन दिवस गृहपाठ द्यावा, असे शालेय शिक्षण विभागाचे सचिव व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे. अनेकदा पालकांना मुलांची मानसिकता समजते आणि मुलांना अभ्यासाचा ताण येत आहे, हे जाणवते; पण आजूबाजूला असणाऱ्या तीव्र स्पर्धेत आपले मूल मागे पडू नये म्हणून पालकही मुलांच्या मागे लागतात आणि अगदी नर्सरीची मुलेही पेन्सिल, वह्या, पुस्तके यांच्या गराड्यात हरवून जातात. यामध्ये मुलांचे बालपण हरवत चालले असून, मुलांना आनंददायी शिक्षण देण्याची गरज असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

कल्पकतेने द्यावा गृहपाठलिहिणे, वाचणे आणि पाठ करणे असे आजच्या गृहपाठांचे स्वरूप आहे. त्यामुळे गृहपाठ बालकांसाठी कंटाळवाणा ठरतो. गृहपाठाचे स्वरूप खेळीमेळीचे केले, कल्पकतेने गृहपाठ दिला तर ते नक्कीच मुलांसाठी मनोरंजनात्मक ठरेल. पुस्तक एके पुस्तक असे गृहपाठाचे स्वरूप न ठेवता प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अभ्यास करणे, विविध घटकांना भेटणे आणि पुस्तकातले ज्ञान व्यवहारात वापरायला शिकविणे, अशा माध्यमातून गृहपाठ असावा. - मधुरा अन्वीकर, मानसोपचारतज्ज्ञ

दप्तराचे वजन मर्यादितच हवेसात-आठ किलो वजनाचे दप्तर पाठीवर वागवणे मुलांच्या आरोग्यासाठी निश्चितच अपायकारक आहे. मुलांच्या वयानुसार हे वजन निश्चित कमी करणे गरजेचे आहे. जास्त ओझ्याच्या दप्तरामुळे मुलांच्या खांद्यावर ताण येतो. खांद्याच्या हाडाच्या वाढीवरही या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय दप्तराच्या ओझ्यामुळे पाठीचे मणके वारंवार दबले जातात. त्यामुळे मणक्यांची रचना बदलण्याची शक्यताही निर्माण होते.- डॉ. अनिल धुळे, अस्थीरोगतज्ज्ञ

न्यायालयाचा निर्णय योग्य  न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून, या निर्णयाचे मन:पूर्वक स्वागत. दप्तराच्या ओझ्यामुळे लहान वयातच मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मागच्या पिढीतही इयत्ता चौथीपर्यंत गृहपाठ नसायचा. आज मुलांना आनंददायी आणि हलके-फुलके शिक्षण देण्याची गरज आहे. वयानुसार वैचारिक पातळी विकसित झाली की मुले आपोआपच अभ्यास करू लागतात. शाळेत सांगण्यात आलेले प्रकल्प बहुतांश वेळा मुलांना झेपण्यासारखे नसतात. त्यामुळे मग पालक किंवा मोठी भावंडेच त्यांचे प्रकल्प पूर्ण करून देतात.  - एस. पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

गृहपाठ दिलाच पाहिजेमुलांचे दप्तराचे ओझे कमी करणे योग्य आहे आणि बहुतांश शाळांमध्ये याबाबत अंमलबजावणीही केली जाते. मात्र, मुलांना गृहपाठ हा दिलाच पाहिजे. यातूनच मुलांची अभ्यास करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांना अभ्यास करण्याची सवय लागते. मोठ्या वर्गात गेल्यावर जास्त अभ्यास करावा लागतो. त्यामुळे जर लहान वयातच सवय लागली तर मुले एका जागी अभ्यास करण्यासाठी बसू शकतात. या गृहपाठाचे प्रमाण मात्र निश्चित हवे.- डॉ. विजय वाडकर, संचालक, अभिनव इंटरनॅशनल स्कूल

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाSchoolशाळाHigh Courtउच्च न्यायालय