शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गरज; मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:05 IST

दप्तराच्या ओझ्याखाली झुकलेली बालके आणि मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आई- वडिलांनीच घेतलेले गृहपाठाचे ‘टेन्शन’ असे चित्र आज अत्यंत सामान्य झाले आहे.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : दप्तराच्या ओझ्याखाली झुकलेली बालके आणि मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आई- वडिलांनीच घेतलेले गृहपाठाचे ‘टेन्शन’ असे चित्र आज अत्यंत सामान्य झाले आहे. स्पर्धेच्या युगात मुलांना पळविताना मुलांच्या क्षमता, त्यांचे वय या गोष्टींचा विचार ना पालक करतात ना शिक्षण संस्था करतात, अशा पालकांना आणि शिक्षकांना दणका देणारा आणि मुलांसाठी सुखावह असणारा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने घेतला असून, या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सीबीएसई शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, मुलांच्या दप्तराच्या ओझ्यावर राज्य सरकारने कटाक्ष ठेवावा आणि या गोष्टींवर केंद्र सरकारने बारकाईने लक्ष द्यावे, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. 

इयत्ता दुसरीपर्यंत गृहपाठ देण्यात येऊ नये आणि इयत्ता तिसरीमध्ये आठवड्यातून दोन दिवस गृहपाठ द्यावा, असे शालेय शिक्षण विभागाचे सचिव व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे. अनेकदा पालकांना मुलांची मानसिकता समजते आणि मुलांना अभ्यासाचा ताण येत आहे, हे जाणवते; पण आजूबाजूला असणाऱ्या तीव्र स्पर्धेत आपले मूल मागे पडू नये म्हणून पालकही मुलांच्या मागे लागतात आणि अगदी नर्सरीची मुलेही पेन्सिल, वह्या, पुस्तके यांच्या गराड्यात हरवून जातात. यामध्ये मुलांचे बालपण हरवत चालले असून, मुलांना आनंददायी शिक्षण देण्याची गरज असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

कल्पकतेने द्यावा गृहपाठलिहिणे, वाचणे आणि पाठ करणे असे आजच्या गृहपाठांचे स्वरूप आहे. त्यामुळे गृहपाठ बालकांसाठी कंटाळवाणा ठरतो. गृहपाठाचे स्वरूप खेळीमेळीचे केले, कल्पकतेने गृहपाठ दिला तर ते नक्कीच मुलांसाठी मनोरंजनात्मक ठरेल. पुस्तक एके पुस्तक असे गृहपाठाचे स्वरूप न ठेवता प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अभ्यास करणे, विविध घटकांना भेटणे आणि पुस्तकातले ज्ञान व्यवहारात वापरायला शिकविणे, अशा माध्यमातून गृहपाठ असावा. - मधुरा अन्वीकर, मानसोपचारतज्ज्ञ

दप्तराचे वजन मर्यादितच हवेसात-आठ किलो वजनाचे दप्तर पाठीवर वागवणे मुलांच्या आरोग्यासाठी निश्चितच अपायकारक आहे. मुलांच्या वयानुसार हे वजन निश्चित कमी करणे गरजेचे आहे. जास्त ओझ्याच्या दप्तरामुळे मुलांच्या खांद्यावर ताण येतो. खांद्याच्या हाडाच्या वाढीवरही या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय दप्तराच्या ओझ्यामुळे पाठीचे मणके वारंवार दबले जातात. त्यामुळे मणक्यांची रचना बदलण्याची शक्यताही निर्माण होते.- डॉ. अनिल धुळे, अस्थीरोगतज्ज्ञ

न्यायालयाचा निर्णय योग्य  न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून, या निर्णयाचे मन:पूर्वक स्वागत. दप्तराच्या ओझ्यामुळे लहान वयातच मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मागच्या पिढीतही इयत्ता चौथीपर्यंत गृहपाठ नसायचा. आज मुलांना आनंददायी आणि हलके-फुलके शिक्षण देण्याची गरज आहे. वयानुसार वैचारिक पातळी विकसित झाली की मुले आपोआपच अभ्यास करू लागतात. शाळेत सांगण्यात आलेले प्रकल्प बहुतांश वेळा मुलांना झेपण्यासारखे नसतात. त्यामुळे मग पालक किंवा मोठी भावंडेच त्यांचे प्रकल्प पूर्ण करून देतात.  - एस. पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

गृहपाठ दिलाच पाहिजेमुलांचे दप्तराचे ओझे कमी करणे योग्य आहे आणि बहुतांश शाळांमध्ये याबाबत अंमलबजावणीही केली जाते. मात्र, मुलांना गृहपाठ हा दिलाच पाहिजे. यातूनच मुलांची अभ्यास करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांना अभ्यास करण्याची सवय लागते. मोठ्या वर्गात गेल्यावर जास्त अभ्यास करावा लागतो. त्यामुळे जर लहान वयातच सवय लागली तर मुले एका जागी अभ्यास करण्यासाठी बसू शकतात. या गृहपाठाचे प्रमाण मात्र निश्चित हवे.- डॉ. विजय वाडकर, संचालक, अभिनव इंटरनॅशनल स्कूल

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाSchoolशाळाHigh Courtउच्च न्यायालय