शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

दहावीत कमी गुण पडण्याच्या धास्तीने विद्यार्थीनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:03 IST

आपल्याला कमी गुण मिळतील,असे तिला वाटत होते. यामुळे ती नाराज राहात होती.

औरंगाबाद: दहावी बोर्डाच्या परिक्षेत कमी गुण मिळतील, या धास्तीने एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ जून रोजी सकाळी गारखेडा परिसरातील विजयनगर येथे घडली.

साक्षी अशोक पांढरे (वय १६,रा. विजयनगर)असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, विजयनगर येथील व्यवसायाने वाहनचालक असलेल्या अशोक पांढरे हे पत्नी, मुलगा आणि मुलगी साक्षीसह राहतात. १६ वर्षीय साक्षीने मार्च महिन्यात दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती.  येत्या चार ते पाच दिवसात दहावी बोर्डाचा निकाल लागणार आहे. परिक्षेचा निकालाचा दिवस जसा, जसा जवळ येत आहे.तस, तशी साक्षी ही नाराज राहात होती. आपल्याला कमी गुण मिळतील,असे तिला वाटत होते. यामुळे ती नाराज राहात होती. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तिची आई कामावर गेली तर वडिल पाणी आणण्यासाठी कडा कार्यालय परिसरात कॅन घेऊन गेले होते. त्यावेळी साक्षी आणि तिचा भाऊ घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यावेळी ती झोपेतून उठली तेव्हा आई-वडिल घरी नाही आणि भाऊ झोपलेला असल्याचे पाहून तिने दार आतून लावून घेत गळफास घेतला. 

पाणी घेऊन आलेल्या वडिलांनी दार वाजविले, मात्र आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले तेव्हा साक्षीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेनंतर त्यांनी साक्षीला बेशुद्धावस्थेत जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी साक्षीला घाटी रुग्णालयात नेण्याचे सांगितले. घाटीत नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी साक्षीला तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक ए.बी.शेख, पोहेकॉ एल.बी. हिंगे तपास करीत आहे.