शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

मिटमिट्यातील हायवे लगतच्या शाळेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:55 IST

मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते.

औरंगाबाद : मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते. यास कारण ठरते ती हायवे लगतची शाळा. शाळा भरताना व सुटताना कधी अपघाताची घटना घडेल याचा नेम नसल्याने गावकर्‍यांना सतत धास्ती असते. गावातील सुरक्षित स्थळी शाळेचे स्थलांतर करण्यात यावे, ही मागील २० वर्षांपासूनची गावकर्‍यांची मागणी. मात्र, शाळेऐवजी शहरातील कचरा गावाच्या डोक्यावर आणून टाकण्याचा घाट ‘मनपा’ने घातला होता. यामुळेच मिटमिटावासीयांचा संयमाचा बांध फुटला. 

औरंगाबाद-नाशिक महामार्गालगत अनेक गावे वसलेली आहेत. त्यातीलच एक मिटमिटा. येथील महानगरपालिकेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हायवेलगतच आहे. ही शाळा मिटमिटावासीयांच्या हृदयाचे ठोके वाढविण्यास कारणीभूत ठरते आहे. या महामार्गावरून २४ तास जडवाहने वेगात असतात.इयत्ता बालवाडी ते दहावीपर्यंतचे ६२० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या समोर ५ ते १० फुटांची मोकळी जागा म्हणजे या शाळेचे मैदान होय. यावरून शाळेच्या बिकट परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. पेव्हर ब्लॉक बसविलेल्या या जागेतच दुचाकी पार्किंग केल्या जातात व तेवढ्याच जागेत विद्यार्थी मधल्या सुटीत डब्बा खातात. हायवेवरून धावणारे जडवाहन कधी अनियंत्रित होईल व शाळेच्या ओट्यावर येईल याचा नेम नाही. 

सकाळी सहावी ते दहावी व बालवाडीचे विद्यार्थी तर दुपारी पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळा भरताना व सुटताना विद्यार्थ्यांना गावात जाण्यासाठी हायवे ओलांडावा लागतो. शाळा सुटली की  विद्यार्थ्यांना पहिले महामार्गालगत उभे केले जाते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शिक्षक-शिक्षिका उभ्या राहतात व दोन्ही बाजूंची वाहने थांबवितात. मग विद्यार्थ्यांना महामार्गाच्या दुसर्‍या बाजूस सोडण्यात येते. अनेकदा वाहनधारक शिक्षकांचे ऐकत नाहीत व विद्यार्थी रस्ता ओलांडत असतानाही भरधाव वाहने दामटली जातात. शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी हिवाळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत ठेवून रस्ता ओलांडावा लागतो. सर्व विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडला की शिक्षकांचा जीव भांड्यात पडतो. शाळा भरताना व सुटल्यावर प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. शाळेचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे. 

शाळेचे स्थलांतर करावेमिटमिटालगत २५० एकर गायरान जमीन आहे. ही जमीन सफारीपार्कसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. येथील ५ एकर जागा मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी उपलब्ध करून द्यावी. मनपाने त्यासाठी येत्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी. मागील २० वर्षांपासून आम्ही शाळा स्थलांतराची मागणी करीत आहोत; पण नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी शाळेसमोर अपघात होतात. काही विद्यार्थ्यांचा बळी त्यात गेला आहे. मनपा आणखी किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार आहे. आता तरी मनपाचे आयुक्त, अधिकारी व नगरसेवकांनी जागे व्हावे. - लक्ष्मण बनकर, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, मिटमिटा