शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी अपघात योजनेलाच ‘अपघात’

By admin | Updated: May 31, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिली जाते.

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत दिली जाते. यासाठी शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरु केली. मात्र या योजनेलाच अपघात झाला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आॅक्टोबर २०१३ पासून ते आजतागायत ४५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर केले. मात्र पैसेच नसल्याने संबंधित कुटुंबियांना जिल्हा परिषदेला खेटे मारण्याची वेळ आली आहे. शासनाच्या वतीने राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तातडीने अनुदान मिळत गेले. मात्र मागील काही महिन्याचा विचार केला असता, पैशाअभावी लाभार्थ्यांना अनुुदानाची प्रतिक्षा करावी लागत आहे. ७ फेब्रुवारी २०१४ रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान पहिली ते आठवी पर्यंतचे पाच तर नववी ते बारावी या वर्गातील ३ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र ७ महिन्यांचा कालावधी शासनाकडून एक छदामही उपलब्ध झालेला नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. ४ ते ५ वेळा पत्रही पाठविण्यात आली. मात्र शिक्षण संचालक कार्यालयाकडून केवळ आश्वासन दिले जात आहे. निधी उपलब्ध होताच वर्ग केला जाईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, २० मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. समितीसमोर प्राथमिकचे १२ तर माध्यमिकचे ४ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी १ प्रस्ताव त्रुटी असल्यामुळे अपात्र ठरला. उर्वरित १५ प्रस्तावांना या समितीने मंजुरी दिली आहे. उपरोक्त लाभार्थ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. एकूण लाभार्थ्यांचा विचार केला असता, ३० लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम लागणार आहे. याची मागणी शासनाकडे केली आहे. शिक्षण संचालकांना याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहारही झाला आहे. परंतु, या पत्रांना केराची टोपली दाखविल्याचे दिसते. (प्रतिनिधी) लाभार्थ्यांत नाराजी प्रस्तावाला मान्यता मिळून अनुदानही मंजूर झाले आहे. मात्र शासनाकडून मागणी केलेली रक्कम मागील सहा ते सात महिन्यापासून उपलब्ध झालेली नाही. शिक्षण विभागाकडूनही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अनुदानाच्या रक्कमेसाठी संबंधित लाभार्थ्यांचे कुटुंबिय शिक्षण विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र शिक्षण विभागाकडूनही संबंधित लाभार्थ्यांना निधी आल्यानंतर वितरित करु, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या कुटुंबियातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.