शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन; ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 12:26 IST

Rain in Marathawada : पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यातील धरणात अपेक्षित पाणीसाठी नव्हता.

औरंगाबाद : मोठ्या प्रतिक्षेनंतर मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून दुपारी १२ पर्यंत दमदार पाऊस झाला. मराठवाड्यातील ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळ अतिवृष्टी खाली आले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळ्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यातील धरणात अपेक्षित पाणीसाठी नव्हता. यामुळे मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. आज पहाटेपासूनच विभागात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यात दमदार सरी कोसळल्या आहेत. यामुळे मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. 

कन्नड घाटात दरड कोसळली

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सिंदफणा- गोदावरी नद्यांना पूर 

पांचाळेश्वर, राक्षसभुवन,सुरळेगाव, म्हाळस पिंपळगावसह विविध गावातील गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. राजपुरकडे जाणा-या कापशी नदीला पूर आल्याने गावात जाणा-या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच अर्धामसला गावात जाणा-या रस्त्यांवरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या सिंदफना नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

ग्राम पंचायत कार्यालयात पाणी शिरलेपरभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील हदगाव ( बु ) येथील गावशेजारील वस्ती तसेच ग्राम पंचायत कार्यालयात आज सकाळी पाणी शिरले.

निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरलानांदेड जिल्ह्यातील कंधारमधील निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाणी येवा ५ .१५७ द.ल.घ.मी. सुरु आहे. त्यामुळे १७७ स्वंयचलीत दरवाजातून १ हजार ७४७ क्युसेस पाणी मानार नदीत विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

'त्या'पाच गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाचपालम तालुक्यातील ग्रामीण भागात ३० आगस्ट रोजी दुपारी २ वाजता झालेल्या मुसळधार पावसाने लेंडी नदीला पूर येऊन सायंकाळी ४ वाजता ५ गावांचा संपर्क शहराशी तुटला होता. तब्बल १६ तास झाले तरीही पूर ओसरला नसल्याने या गावांचा संपर्क अजूनही तुटला असून ग्रामस्थ गावातच अडकून पडले आहेत.

धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली, शेतकरी सुखावला बीड जिल्ह्यातील धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली आहेत. घागरवडा आरणवाडी, कुंडलीका ही धरणे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भरली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा पिकांना फायदाच होणार आसल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादagricultureशेती