शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन; ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 12:26 IST

Rain in Marathawada : पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यातील धरणात अपेक्षित पाणीसाठी नव्हता.

औरंगाबाद : मोठ्या प्रतिक्षेनंतर मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून दुपारी १२ पर्यंत दमदार पाऊस झाला. मराठवाड्यातील ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळ अतिवृष्टी खाली आले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळ्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यातील धरणात अपेक्षित पाणीसाठी नव्हता. यामुळे मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. आज पहाटेपासूनच विभागात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यात दमदार सरी कोसळल्या आहेत. यामुळे मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. 

कन्नड घाटात दरड कोसळली

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सिंदफणा- गोदावरी नद्यांना पूर 

पांचाळेश्वर, राक्षसभुवन,सुरळेगाव, म्हाळस पिंपळगावसह विविध गावातील गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. राजपुरकडे जाणा-या कापशी नदीला पूर आल्याने गावात जाणा-या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच अर्धामसला गावात जाणा-या रस्त्यांवरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या सिंदफना नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

ग्राम पंचायत कार्यालयात पाणी शिरलेपरभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील हदगाव ( बु ) येथील गावशेजारील वस्ती तसेच ग्राम पंचायत कार्यालयात आज सकाळी पाणी शिरले.

निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरलानांदेड जिल्ह्यातील कंधारमधील निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाणी येवा ५ .१५७ द.ल.घ.मी. सुरु आहे. त्यामुळे १७७ स्वंयचलीत दरवाजातून १ हजार ७४७ क्युसेस पाणी मानार नदीत विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

'त्या'पाच गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाचपालम तालुक्यातील ग्रामीण भागात ३० आगस्ट रोजी दुपारी २ वाजता झालेल्या मुसळधार पावसाने लेंडी नदीला पूर येऊन सायंकाळी ४ वाजता ५ गावांचा संपर्क शहराशी तुटला होता. तब्बल १६ तास झाले तरीही पूर ओसरला नसल्याने या गावांचा संपर्क अजूनही तुटला असून ग्रामस्थ गावातच अडकून पडले आहेत.

धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली, शेतकरी सुखावला बीड जिल्ह्यातील धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली आहेत. घागरवडा आरणवाडी, कुंडलीका ही धरणे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भरली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा पिकांना फायदाच होणार आसल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादagricultureशेती