शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यभर पावसाची दमदार हजेरी; मराठवाड्यात मात्र १२६ मि.मी. पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 16:55 IST

पाऊस झाला नाहीतर जलप्रकल्पांचीही परिस्थिती नाजूक होण्याची शक्यता

ठळक मुद्देबीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा छावण्या सुरूच आहेत. मराठवाड्यातील खरीप पिक धोक्यात आहे.

औरंगाबाद : राज्यभर पावसाच्या दमदार हजेरीमुळे नद्या दुथडी भरून वाहत असताना मराठवाडा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विभागात १२६ मिलीमीटर पावसाची तूट जुलै संपला तरी कायम आहे. विभागातील ८७२ प्रकल्पांत एक टक्क्याच्या आसपास पाणीसाठा सध्या आहे.  

पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या ८४ टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. १६ टक्के पेरण्या पावसाअभावी झाल्या नाहीत. विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि. मी. इतकी आहे. आजवर २१७ मि. मी. पाऊस झाला. ३४३ मि. मी. पाऊस विभागात आजवर होणे अपेक्षित होते.  टक्केवारीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते. तर सरासरीच्या तुलनेत १२६ मि. मी. पावसाची तूट आहे. परिणामी मराठवाड्यातील खरीप  धोक्यात आहे. अगामी काळात दमदार पाऊस झाला नाहीतर जलप्रकल्पांचीही परिस्थिती नाजूक होण्याची शक्यता आहे. आजपासून आॅगस्ट महिना लागला आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा छावण्या सुरूच आहेत. तर २ हजारांच्या आसपास टँकर सुरू आहेत. विभागात ११ मोठ्या प्रकल्पांत ०.५० टक्के पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ३ टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत दीड टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ०.१५ टक्के पाणी आहे. 

बुधवार सकाळपर्यंत १६.१६ मि. मी. पाऊसबुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विभागात १६.१६ मि. मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये विभागातील बीड वगळता सर्व जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. औरंगाबादमध्ये १५.५ मि. मी., जालना १७.१० मि.मी., परभणी ११.०५ मि.मी., हिंगोली २९.४९ मि.मी., नांदेड २६.३० मि.मी., बीड ७.६० मि.मी., लातूर १०.२७ मि.मी. तर उस्मानाबादमध्ये ११.४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र