शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुले पळविण्याच्या अफवातून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई; पोलीस अधीक्षकांचा इशारा 

By राम शिनगारे | Updated: September 30, 2022 18:23 IST

औरंगाबाद जिल्ह्यात तीन घटनाची पोलिसांनी केली पडताळणी

औरंगाबाद : जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवा सतत सोशल मिडीयावर पसरविण्यात येत आहे. या अफवातून जमावांनी पकडलेल्यांची सुटका जिल्हा ग्रामीण पोलिसांनी केली. या अफवामुळे निरपराध व्यक्तीला मारहाण करीत कायदा होतात घेतला जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अधीक्षक कलवानिया म्हणाले, अनोळखी महिला, पुरुष, भिकारीसह इतर कोणतीही व्यक्तीची खातरजमा न करताच केवळ वेशभुषा, हालचालीवरुन मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरुन जमाव मारहाण करतात. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. या प्रकारच्या तीन घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत. भोकरदन ते जालना रस्त्यावर सखाराम जाधव यांच्या दुचाकीला कारचालकाने धडक दिली. यात जाधव यांचा नातु दिपक झरे हा गाडीच्या बोनटवर आदळला. त्यास चालकाने आठ किलोमिटरपर्यंत सिल्लोडच्या दिशेने नेले. मुलाच्या ओरडण्यामुळे नागरिकांनी मुले चोरणारी टाळी असल्याच्या संशयावरुन पाठलाग केला. ८०० ते १००० हजार लोकांच्या जमावाने कारची तोडफोड केली. त्यातील पवन बनकर (रा. गोळेगाव, ता. सिल्लोड) याच्यासह एकाला बेदम मारहाण केली. सिल्लोड पोलिसांनी जखमीची जमावाच्या तावडीतुन सुटका केली. 

दुसरी घटना सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात घडली. गावातील शाळकरी मुलाचे अपहरण टोळीने केल्याचे पाेलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करीत जिल्ह्याच्या सिमा बंद केल्या. चौकशीत ती अफवाच निघाली. वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंद येथे ही मुले पळविण्यात येत असल्याची माहिती पसरवली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी गेल्यानंतर ती सुद्धा अफवाच निघाली. नागरिकांनी कोणतीही माहिती शहनिशा केल्याशिवाय पुढे फॉरवर्ड करू नये, अफवांवर विश्वास ठेवु नका असे अवाहनही अधीक्षक कलवानिया यांनी केले. यावेळी एलसीबीचे निरीक्षक रामेश्वर रेंगे उपस्थित होते.

दोन पोलिसांचे निलंबनशहरात गुन्हा नोंदविलेल्या साहेबराव ईखारे या पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित केले असून, त्यांच्यावर विभागीय चौकशी समिती बसवली आहे. तर व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संतोष वाघ या कर्मचाऱ्याचेही निलंबन केल्याची माहिती अधीक्षक कलवानिया यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस