शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

अजबच! शिवाजीनगर भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होईना, आता वरून टाकणार पत्र्याचे छत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:58 IST

पाणी निचरा होण्याचा मार्ग योग्य पद्धतीने करण्यात आला नसल्यानेच हा भुयारी मार्ग पावसात तुंबत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गात गेल्या दोन महिन्यात दोनवेळा पाणी साचले. पाणी निचरा होण्याचा मार्ग योग्य पद्धतीने करण्यात आला नसल्यानेच हा भुयारी मार्ग पावसात तुंबत आहे. मात्र, पाणी निचरा होण्याच्या कामाऐवजी भुयारी मार्गावर पत्रे बसवण्याचा प्रयोग केला जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘आजार म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला’ अशी ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे १५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. मात्र, शहरात १८ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शिवाजीनगर येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि भुयारी मार्गाची पोलखोल झाली. यानंतर रेल्वे प्रशासनासह अन्य यंत्रणांनी युद्धपातळीवर भुयारी मार्गाच्या ठिकाणी पाणी निचरा होण्यासंबंधी काम केले. परंतु, त्यानंतरही १२ जुलै रोजी पुन्हा या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. पाणी निचरा होण्यासंबंधी काम करण्याऐवजी भुयारी मार्गावर पत्रे बसवण्याचा जुगाड केला जात असल्याने आणि त्यासाठी भुयारी मार्गातील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

शहानूरमियाँ दर्गा चौकात खोळंब्याची शक्यतापाच दिवस शिवाजीनगर भुयारी मार्ग बंद राहणार असल्याने नागरिकांना संग्रामनगर उड्डाणपूल, शहानुरमियाँ दर्गा चौकातून वळसा मारावा लागणार आहे. परिणामी, एकाच चौकावर वाहनांचा भार पडणार असून, येथील वाहतूक खोळंबा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

कामासाठी भुयारी मार्ग बंद करू नयेपत्रे बसवण्याच्या कामासाठी भुयारी मार्ग बंद करता कामा नये. विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होईल. पत्रे बसवल्यानंतर पाणी साचते की नाही, हे पुढे समोर येईलच. परंतु, हे काम रात्रीही करता येईल. दोन ते तीन दिवसात काम पूर्ण करावे.- बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTrafficवाहतूक कोंडी