शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

समितीचे काम बंद करून मराठा आरक्षण द्या; अन्यथा त्यानंतर सरकार जबाबदार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 12:16 IST

मराठ्यांचा समावेश ओबीसीत करावा, समितीचा घाट घालू नका, सरकारला विनंती

अंतरवाली सराटी: केंद्राला हात जोडून विनंती आहे, गोरगरीब समाजाचे हाल करू नका.केंद्र आणि राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहू शकणार नाहीत. ५००० पुरावे मिळाल्याने आता आरक्षण समितीचे काम बंद करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले. तसेच सरकारकडे आणखी दहा दिवस आहेत, येथे आलेल्या लाखोंच्या जनसागराचे एकचे मागणे आहे, मराठ्यांना आरक्षण द्या. या दहा दिवसात आरक्षण पाहिजेच, जर तुम्ही नाही दिले तर चाळीसाव्या दिवशी सांगू पुढे काय करायचे, त्यानंतर सरकार जबाबदार राहील, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला. 

अंतरवाली सराटी येथील सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.जरांगे पुढे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांनी मोठे केलेले राजकारणी आम्हाला विचारतो सभेसाठी पैसे कोठून आला. १२३ गावांतील फक्त २३ गावांतून २१ लाख जमा झाले.लोकांनी पैसे दिले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याला काय बोलावे ते कळायला हवे. अजित पवार यांनी त्यांना समज द्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे यांनी केले. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना देखील समज देण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केले. मराठे दिलेला शब्द मोडत नाही. सभेसाठी आलेला समाज शांततेत आला आणि शांततेच जाणार. पोलिस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आपण त्यांना सहकार्य  करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. 

काय म्हणाले मनोज जरांगे: - मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीमधूनच आरक्षण द्या - कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या - दर दहा वर्षांनी ओबीसीचा सर्वे करा, प्रगत जातींना ओबीसीमधून बाहेर काढा - वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिले तरी चालेल, पण 50 टक्क्यातच आरक्षण द्यावे, वेगळा प्रवर्ग टिकला पाहिजे

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादJalanaजालना