शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समितीचे काम बंद करून मराठा आरक्षण द्या; अन्यथा त्यानंतर सरकार जबाबदार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 12:16 IST

मराठ्यांचा समावेश ओबीसीत करावा, समितीचा घाट घालू नका, सरकारला विनंती

अंतरवाली सराटी: केंद्राला हात जोडून विनंती आहे, गोरगरीब समाजाचे हाल करू नका.केंद्र आणि राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहू शकणार नाहीत. ५००० पुरावे मिळाल्याने आता आरक्षण समितीचे काम बंद करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले. तसेच सरकारकडे आणखी दहा दिवस आहेत, येथे आलेल्या लाखोंच्या जनसागराचे एकचे मागणे आहे, मराठ्यांना आरक्षण द्या. या दहा दिवसात आरक्षण पाहिजेच, जर तुम्ही नाही दिले तर चाळीसाव्या दिवशी सांगू पुढे काय करायचे, त्यानंतर सरकार जबाबदार राहील, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला. 

अंतरवाली सराटी येथील सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.जरांगे पुढे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांनी मोठे केलेले राजकारणी आम्हाला विचारतो सभेसाठी पैसे कोठून आला. १२३ गावांतील फक्त २३ गावांतून २१ लाख जमा झाले.लोकांनी पैसे दिले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याला काय बोलावे ते कळायला हवे. अजित पवार यांनी त्यांना समज द्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे यांनी केले. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना देखील समज देण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केले. मराठे दिलेला शब्द मोडत नाही. सभेसाठी आलेला समाज शांततेत आला आणि शांततेच जाणार. पोलिस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आपण त्यांना सहकार्य  करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. 

काय म्हणाले मनोज जरांगे: - मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीमधूनच आरक्षण द्या - कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या - दर दहा वर्षांनी ओबीसीचा सर्वे करा, प्रगत जातींना ओबीसीमधून बाहेर काढा - वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिले तरी चालेल, पण 50 टक्क्यातच आरक्षण द्यावे, वेगळा प्रवर्ग टिकला पाहिजे

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादJalanaजालना