शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दादागिरी थांबवून शिस्तीने वागा,नंतरच मीटर दरवाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:35 IST

जिल्ह्याधिकाऱ्यांची रिक्षाचालकांना विविध सूचना; रिक्षाचालकांकडून मीटर दरवाढीची मागणी होत आहे परंतु मीटर दरवाढीचा बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक दादागिरी करत असल्याची तक्रारी होतात. रस्त्यावर कुठेही रिक्षा उभ्या केल्या जातात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रिक्षाचालकांनी आधी वाहतूक नियमांचे पालन करावे, शिस्तीने वागावे, त्यानंतर मीटर दरवाढीचा विचार केला जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रिक्षाचालकांना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी रिक्षाचालकांच्या समस्या, वाहतूक नियमांचे पालन, वाहतूक आणि सुरक्षेबाबत शिस्तीच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, रिक्षाचालक संघटनेचे निसार अहेमद खान, नाहीद फारुकी, जाकेर पठाण, शेख लतीफ, मनोज जैस्वाल, रमाकांत जोशी, मोहंम्मद बशीर, मोहंम्मद फारुख रोशन, राजेश रावळकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांच्या विविध समस्या जाणून घेत सूचना केल्या. गेल्या काही महिन्यांत इंधन दरात वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांकडून मीटर दरवाढीची मागणी होत आहे परंतु मीटर दरवाढीचा बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे रिक्षाचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

मीटर दरवाढीचा लवकरच निर्णयमीटर दरवाढीचा प्रस्ताव आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. शेअर रिक्षालाही परवानगी दिली जाणार आहे. रिक्षाचालकांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. गणवेश घातला पाहिजे. बॅच लावला पाहिजे. प्रवाशांबरोबर योग्य पद्धतीने वागले पाहिजे. यासंदर्भात सूचना केल्या आहेत.- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

८० टक्के रिक्षाचालक नियमाने वागतातशिस्तीचे पालन करावे, तरच मीटर दरवाढ केली जाईल, असे सांगितले परंतु रिक्षाचालकांना उपाशी ठेवून शिस्त लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. आधी मीटर दरवाढ द्यावी, रिक्षाथांबे द्यावे. ८० टक्के रिक्षाचालक शिस्तीचे पालन करतात, असे रिक्षाचालक-मालक महासंघाचे निसार अहेमद खान म्हणाले.

रिक्षाचालकांनी करावी ही सुधारणा- गणवेश घालूनच रिक्षा चालवणे.- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवू नये.- वाहतूक नियमांचे पालन करावे.- रस्त्यावर कुठेही रिक्षा उभी करू नये.- प्रवाशांबरोबर सौजन्याने वागावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादtourismपर्यटन