शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दादागिरी थांबवून शिस्तीने वागा,नंतरच मीटर दरवाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:35 IST

जिल्ह्याधिकाऱ्यांची रिक्षाचालकांना विविध सूचना; रिक्षाचालकांकडून मीटर दरवाढीची मागणी होत आहे परंतु मीटर दरवाढीचा बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक दादागिरी करत असल्याची तक्रारी होतात. रस्त्यावर कुठेही रिक्षा उभ्या केल्या जातात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रिक्षाचालकांनी आधी वाहतूक नियमांचे पालन करावे, शिस्तीने वागावे, त्यानंतर मीटर दरवाढीचा विचार केला जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रिक्षाचालकांना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी रिक्षाचालकांच्या समस्या, वाहतूक नियमांचे पालन, वाहतूक आणि सुरक्षेबाबत शिस्तीच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, रिक्षाचालक संघटनेचे निसार अहेमद खान, नाहीद फारुकी, जाकेर पठाण, शेख लतीफ, मनोज जैस्वाल, रमाकांत जोशी, मोहंम्मद बशीर, मोहंम्मद फारुख रोशन, राजेश रावळकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांच्या विविध समस्या जाणून घेत सूचना केल्या. गेल्या काही महिन्यांत इंधन दरात वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांकडून मीटर दरवाढीची मागणी होत आहे परंतु मीटर दरवाढीचा बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे रिक्षाचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

मीटर दरवाढीचा लवकरच निर्णयमीटर दरवाढीचा प्रस्ताव आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. शेअर रिक्षालाही परवानगी दिली जाणार आहे. रिक्षाचालकांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. गणवेश घातला पाहिजे. बॅच लावला पाहिजे. प्रवाशांबरोबर योग्य पद्धतीने वागले पाहिजे. यासंदर्भात सूचना केल्या आहेत.- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

८० टक्के रिक्षाचालक नियमाने वागतातशिस्तीचे पालन करावे, तरच मीटर दरवाढ केली जाईल, असे सांगितले परंतु रिक्षाचालकांना उपाशी ठेवून शिस्त लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. आधी मीटर दरवाढ द्यावी, रिक्षाथांबे द्यावे. ८० टक्के रिक्षाचालक शिस्तीचे पालन करतात, असे रिक्षाचालक-मालक महासंघाचे निसार अहेमद खान म्हणाले.

रिक्षाचालकांनी करावी ही सुधारणा- गणवेश घालूनच रिक्षा चालवणे.- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवू नये.- वाहतूक नियमांचे पालन करावे.- रस्त्यावर कुठेही रिक्षा उभी करू नये.- प्रवाशांबरोबर सौजन्याने वागावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादtourismपर्यटन