शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबादसाठी विमानसेवा वाढविण्याच्या दिशेने पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:37 IST

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या हालचालींना वेग

ठळक मुद्देमागणीनुसार औरंगाबादहून सेवा सुरू करण्याचा प्रयत्नअनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका

औरंगाबाद : औरंगाबादहूनविमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टिष्ट्वट करून दिली. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल पडल्याचे दिसत आहे. 

नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी टष्ट्वीट करून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती दिली. मागणीचा विचार क रून कंपन्यांकडून विमानसेवा सुरू केली जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांत औरंगाबादहून सुरू असलेली विमाने बंद पडली. दोन महिन्यांपूर्वी जेट एअरवेजची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा बंद पडली. यापूर्वी औरंगाबादहून सुरू असलेली स्पाईस जेटची विमानसेवा बंद झाली होती. सध्या एअर इंडिया, ट्रूजेट या दोन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांमुळे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद शहराबरोबर विमान हवाई सेवेने जोडलेले आहे. शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी  आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

इंडिगो एअरलाईन्स, डेक्कन एव्हिएशनसह झूम एअर या कंपन्यांनी औरंगाबादहून विमान सुरू करण्यास रुची दर्शविली होती. औरंगाबाद-दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यास झूम एअरने प्रस्तावही डीजीसीएकडे सादर केला होता. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर औरंगाबाद-दिल्ली मार्गाची नोंद करून विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेतही दिले होते; परंतु प्रत्यक्षात या विमान  कंपन्यांची प्रतीक्षाच आहे.

विमानसेवेच्या अनियमिततेमुळे उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटकाचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. ४जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक उद्योग, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची मागणी होते आहे.    

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानAurangabadऔरंगाबाद