शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:12 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत समितीची स्थापना; स्वयंसेवी संस्थांकडून निधी उभारणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी (दि.१२) झाली. या बैठकीत एकूण २२ विषय चर्चेला आले. तर ऐनवेळी ४ विषय घेण्यात आले. यात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला असल्याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. अनेक विद्यार्थ्यांना गावाकडून येणारे पैसे बंद झाल्यामुळे शिक्षण सोडून परत जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मागील दुष्काळात विद्यार्थ्यांना मोफत जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. यावेळीही काही स्वयंसेवी संस्थांची आर्थिक मदत घेऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भूमिकेला व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, उद्योगांकडून आर्थिक मदत मिळविणे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे मदत करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीमध्ये किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, प्रा. सुनील निकम, डॉ. शंकर अंभोरे आणि डॉ. राहुल म्हस्के यांचा समावेश आहे. याशिवाय व्यवस्थापन परिषदेत सिमेंट रस्त्याऐवजी डांबरी रस्ता बनविणे, वाहन भत्त्यात वाढ करणे, असे नियमित विषयांनाही मंजुरी देण्यात आली आहे.विद्यापीठाच्या जमिनीचा घेणार आढावाविद्यापीठाने विविध संस्थांना शेकडो एकर जमीन लीजवर दिलेली आहे. यातील काही संस्था जमिनीचा वापर योग्य कारणासाठी करीत नाहीत. या संस्थांकडून जमिनीच्या वापराची माहिती घेऊन वापरात असलेली जमीन संस्थांकडे ठेवणे आणि उर्वरित शिल्लक जमीन परत घेण्यासाठीची एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. फुलचंद सलामपुरे यांची नियुक्ती केली. तर डॉ.राजेश करपे आणि डॉ. शंकर अंभोरे यांची सदस्यपदी नियुक्ती केली.प्राध्यापकांना मिळणार १५ सीएल रजाव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ऐनवेळी महाविद्यालयातील संलग्न प्राध्यापकांना ८ किरकोळ रजा (सीएल) मंजूर करण्यात येतात. मात्र राज्यातील इतर विद्यापीठे १५ सीएल देतात. त्यांच्याप्रमाणेच आपल्या विद्यापीठातही १५ सीएल रजा देण्याचा ठराव डॉ. राजेश करपे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :droughtदुष्काळuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद