शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने जीव वाचला, सिक्कीममध्ये पुरात अडकलेले पर्यटक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:42 IST

नातेवाईकांसोबत झाला संपर्क;सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला सोडले

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड: सिक्कीममध्ये पर्यटनासाठी गेलेले सिल्लोडमधील दोन कुटुंबातील ८ सदस्य पुरामुळे अडकले होते. त्यांचा अखेर संपर्क झाला असून ते लाचुंग येथील हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक आणि महाराष्ट्र प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, सिक्कीम प्रशासनाने त्यांना हेलिकॉप्टरने लाचुंग येथून एअरपोर्टला सोडल्याची माहिती पर्यटकांचे नातेवाईक नंदकिशोर सहारे यांनी लोकमतला दिली.

सिल्लोड शहरातील सहारे आणि जैन या दोन कुटुंबातील आठ सदस्य पर्यटनासाठी सिक्कीमला गेले होते. कुणाल सुरेश सहारे, पत्नी राजश्री त्यांचा मुलगा सर्वांष,मुलगी साईशा तर स्नेहेश कांतीलाल जैन (ओस्तवाल), पत्नी शितल त्यांची मुलगी मोक्षा, मुलगा सिद्धांत ही लाचुंग येथील हॉटेल यशश्री येथे थांबले होते. अचानक अतिवृष्टी झाल्याने तिस्ता नदीच्या खोऱ्यात महापूर आला. यामुळे दोन्ही कुटुंबाचा नतेवाईकांसोबतचा संपर्क ३ ऑक्टोबरपासून तुटला होता. याची माहिती मिळताच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकार व तेथील कमिशनर यांच्याशी संपर्क केला. मात्र तेथील पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कुणाशी संपर्क झाला नसल्याचे प्रशासनाने शनिवारी  कळवले होते. दरम्यान, रविवारी रात्री कमिशनर व पोलीस प्रशासनाने शोध घेतला असता सर्वजण हॉटेलमध्ये सुरक्षित आढळले. त्यानंतर आज सकाळी सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला आणून सोडले. दोन दिवसात सर्वजण छत्रपती संभाजी नगरला पोहचतील अशी माहिती नंदकिशोर सहारे यांनी दिली.

उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने अनर्थ टळलापर्यटक सुदैवाने ज्या नदीला पूर आला होता त्याच्या विरुद्ध दिशेला उंचावर असलेल्या हॉटेलमध्ये थांबले होते. यामुळे दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsikkimसिक्किमfloodपूरtourismपर्यटन