शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने जीव वाचला, सिक्कीममध्ये पुरात अडकलेले पर्यटक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:42 IST

नातेवाईकांसोबत झाला संपर्क;सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला सोडले

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड: सिक्कीममध्ये पर्यटनासाठी गेलेले सिल्लोडमधील दोन कुटुंबातील ८ सदस्य पुरामुळे अडकले होते. त्यांचा अखेर संपर्क झाला असून ते लाचुंग येथील हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक आणि महाराष्ट्र प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, सिक्कीम प्रशासनाने त्यांना हेलिकॉप्टरने लाचुंग येथून एअरपोर्टला सोडल्याची माहिती पर्यटकांचे नातेवाईक नंदकिशोर सहारे यांनी लोकमतला दिली.

सिल्लोड शहरातील सहारे आणि जैन या दोन कुटुंबातील आठ सदस्य पर्यटनासाठी सिक्कीमला गेले होते. कुणाल सुरेश सहारे, पत्नी राजश्री त्यांचा मुलगा सर्वांष,मुलगी साईशा तर स्नेहेश कांतीलाल जैन (ओस्तवाल), पत्नी शितल त्यांची मुलगी मोक्षा, मुलगा सिद्धांत ही लाचुंग येथील हॉटेल यशश्री येथे थांबले होते. अचानक अतिवृष्टी झाल्याने तिस्ता नदीच्या खोऱ्यात महापूर आला. यामुळे दोन्ही कुटुंबाचा नतेवाईकांसोबतचा संपर्क ३ ऑक्टोबरपासून तुटला होता. याची माहिती मिळताच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकार व तेथील कमिशनर यांच्याशी संपर्क केला. मात्र तेथील पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कुणाशी संपर्क झाला नसल्याचे प्रशासनाने शनिवारी  कळवले होते. दरम्यान, रविवारी रात्री कमिशनर व पोलीस प्रशासनाने शोध घेतला असता सर्वजण हॉटेलमध्ये सुरक्षित आढळले. त्यानंतर आज सकाळी सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला आणून सोडले. दोन दिवसात सर्वजण छत्रपती संभाजी नगरला पोहचतील अशी माहिती नंदकिशोर सहारे यांनी दिली.

उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने अनर्थ टळलापर्यटक सुदैवाने ज्या नदीला पूर आला होता त्याच्या विरुद्ध दिशेला उंचावर असलेल्या हॉटेलमध्ये थांबले होते. यामुळे दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsikkimसिक्किमfloodपूरtourismपर्यटन