शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने जीव वाचला, सिक्कीममध्ये पुरात अडकलेले पर्यटक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:42 IST

नातेवाईकांसोबत झाला संपर्क;सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला सोडले

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड: सिक्कीममध्ये पर्यटनासाठी गेलेले सिल्लोडमधील दोन कुटुंबातील ८ सदस्य पुरामुळे अडकले होते. त्यांचा अखेर संपर्क झाला असून ते लाचुंग येथील हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक आणि महाराष्ट्र प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, सिक्कीम प्रशासनाने त्यांना हेलिकॉप्टरने लाचुंग येथून एअरपोर्टला सोडल्याची माहिती पर्यटकांचे नातेवाईक नंदकिशोर सहारे यांनी लोकमतला दिली.

सिल्लोड शहरातील सहारे आणि जैन या दोन कुटुंबातील आठ सदस्य पर्यटनासाठी सिक्कीमला गेले होते. कुणाल सुरेश सहारे, पत्नी राजश्री त्यांचा मुलगा सर्वांष,मुलगी साईशा तर स्नेहेश कांतीलाल जैन (ओस्तवाल), पत्नी शितल त्यांची मुलगी मोक्षा, मुलगा सिद्धांत ही लाचुंग येथील हॉटेल यशश्री येथे थांबले होते. अचानक अतिवृष्टी झाल्याने तिस्ता नदीच्या खोऱ्यात महापूर आला. यामुळे दोन्ही कुटुंबाचा नतेवाईकांसोबतचा संपर्क ३ ऑक्टोबरपासून तुटला होता. याची माहिती मिळताच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकार व तेथील कमिशनर यांच्याशी संपर्क केला. मात्र तेथील पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कुणाशी संपर्क झाला नसल्याचे प्रशासनाने शनिवारी  कळवले होते. दरम्यान, रविवारी रात्री कमिशनर व पोलीस प्रशासनाने शोध घेतला असता सर्वजण हॉटेलमध्ये सुरक्षित आढळले. त्यानंतर आज सकाळी सिक्कीम प्रशासनाने हेलिकॉप्टरने एअरपोर्टला आणून सोडले. दोन दिवसात सर्वजण छत्रपती संभाजी नगरला पोहचतील अशी माहिती नंदकिशोर सहारे यांनी दिली.

उंचावरील हॉटेलमध्ये थांबल्याने अनर्थ टळलापर्यटक सुदैवाने ज्या नदीला पूर आला होता त्याच्या विरुद्ध दिशेला उंचावर असलेल्या हॉटेलमध्ये थांबले होते. यामुळे दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsikkimसिक्किमfloodपूरtourismपर्यटन