शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कागदावरच; कार्यान्वित कधी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 19:41 IST

१७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा जीआर न काढल्यास जनता विकास परिषद उतरणार रस्त्यावर

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद :मराठवाडा वैधानिक विकास मंडळासह राज्यातील सर्व विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची घोषणा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केली. तसा निर्णयही मंत्रिमंडळात घेतला. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) न काढल्याने मुदतवाढीचे घोंगडे भिजत पडले आहे.

राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत संपून अडीच वर्षे झाले तरी मुदतवाढ न मिळाल्याने या मंडळांचे कार्य ठप्प झाले आहे. यावर मराठवाड्यातून मागणी झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवरून पायउतार होण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतील बहुतांश निर्णय रद्द केले. विकास मंडळांच्या मुदतवाढीचा निर्णय मात्र कायम ठेवला. परंतु, अद्याप या संबंधीचा जीआर काढलेला नाही. परिणामी, या मंडळांवरील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

सचिवही प्रतीक्षेत, ना शिपाई, ना चालकजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे फक्त कार्यालय चालू आहे. आयएएस दर्जाचे सचिव विजयकुमार फड कार्यालयात बसून असतात. त्यांना ना ड्रायव्हर उपलब्ध आहे, ना शिपाई. चार-पाच कर्मचारी आहेत; पण त्यांनाही काम नाही.

विकास परिषदेने दिला आंदोलनाचा इशाराअलीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लातूरला आले असताना मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर शाखेने त्यांना निवेदन सादर केले व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीवर चर्चा झाली. त्यावेळी राज्यपाल एवढेच म्हणाले की, हो जायेगा!’ सोमवारी औरंगाबादेत जनता विकास परिषदेची बैठक झाली. परिषदेचे अध्यक्ष व माजी खा. व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देेण्यात आला. मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत (१७ सप्टेंबर) मुदतवाढीचा जीआर काढण्यात आला नाही तर जनता विकास परिषद रस्त्यावर उतरणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार