शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कागदावरच; कार्यान्वित कधी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 19:41 IST

१७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा जीआर न काढल्यास जनता विकास परिषद उतरणार रस्त्यावर

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद :मराठवाडा वैधानिक विकास मंडळासह राज्यातील सर्व विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची घोषणा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केली. तसा निर्णयही मंत्रिमंडळात घेतला. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) न काढल्याने मुदतवाढीचे घोंगडे भिजत पडले आहे.

राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत संपून अडीच वर्षे झाले तरी मुदतवाढ न मिळाल्याने या मंडळांचे कार्य ठप्प झाले आहे. यावर मराठवाड्यातून मागणी झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवरून पायउतार होण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतील बहुतांश निर्णय रद्द केले. विकास मंडळांच्या मुदतवाढीचा निर्णय मात्र कायम ठेवला. परंतु, अद्याप या संबंधीचा जीआर काढलेला नाही. परिणामी, या मंडळांवरील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

सचिवही प्रतीक्षेत, ना शिपाई, ना चालकजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे फक्त कार्यालय चालू आहे. आयएएस दर्जाचे सचिव विजयकुमार फड कार्यालयात बसून असतात. त्यांना ना ड्रायव्हर उपलब्ध आहे, ना शिपाई. चार-पाच कर्मचारी आहेत; पण त्यांनाही काम नाही.

विकास परिषदेने दिला आंदोलनाचा इशाराअलीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लातूरला आले असताना मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर शाखेने त्यांना निवेदन सादर केले व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीवर चर्चा झाली. त्यावेळी राज्यपाल एवढेच म्हणाले की, हो जायेगा!’ सोमवारी औरंगाबादेत जनता विकास परिषदेची बैठक झाली. परिषदेचे अध्यक्ष व माजी खा. व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देेण्यात आला. मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत (१७ सप्टेंबर) मुदतवाढीचा जीआर काढण्यात आला नाही तर जनता विकास परिषद रस्त्यावर उतरणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार