शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने २७ बेरोजगारांची फसवणूक प्रकरणी पोलिसांचे खंडपीठात निवेदन

By प्रभुदास पाटोळे | Updated: February 19, 2024 19:23 IST

२७ बेरोजगारांकडून रोख, ऑनलाइन आणि विविध बँक खात्यांद्वारे वेळोवेळी एकूण ७३ लाख ८३ हजार रुपये घेऊन केली फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून २७ बेरोजगारांची २७ लाखांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा लवकरच तपास पूर्ण करून अंतिम अहवाल दाखल करू, असे पोलिसांनी निवेदन केले. त्यावरून औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. शैलेष ब्रह्मे यांनी पोलिसांचा खुलासा वजा निवेदन स्वीकारून याचिका निकाली काढली.

यासंदर्भात एक वर्षापूर्वी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापपर्यंत कुठलीही प्रगती झाली नसल्यामुळे मूळ फिर्यादी ठकाजी श्रीरंग काळे यांनी ॲड. वैभव जी. देशमुख यांच्यामार्फत दाखल केलेल्या फौजदारी याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. दरम्यान, फसवणूक करणाऱ्यांपैकी सूरज प्रदीप गोमासे याचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी यांनी नामंजूर केला आहे.

सकृदर्शनी प्रथम माहिती अहवालातील (एफआयआर) आरोपात तथ्य आढळते. गुन्ह्यात अर्जदार सूरजचा सक्रिय सहभाग आणि त्याने निभावलेली महत्त्वाची भूमिका, त्याने व इतर आरोपींनी फिर्यादीप्रमाणेच अनेकांची फसवणूक केल्याचे तपासाच्या कागदपत्रांवरून आढळते. गुन्ह्याचे गांभीर्य आणि अर्जदाराचा गुन्ह्यातील सहभाग पाहता गुन्ह्याच्या योग्यप्रकारे तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने सूरजचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.

राज्य परिवहन खात्यातील वाहन चालक ठकाजी काळेच्या फिर्यादीनुसार त्यांची पुणे येथील राज्य परिवहन खात्यातील अण्णासाहेब गोहत्रे यांची ओळख होती. अण्णासाहेबने त्यांचे मित्र सुनील गोपाळ लोगडे (रा. चनाबकती, जिल्हा गोंदिया) आणि सूरज प्रदीप गोमासे (रा.साकोली, जि, भंडारा) यांची ओळख करून दिली होती. सुनील आणि सूरज यांनी ते आयकर खात्यात नोकरी करीत असल्याचे भासवून गरजूंना रेल्वेत नोकरी लावून देऊ शकतात असे काळे यांना सांगितले. काळेचा विश्वास बसावा यासाठी सुनील आणि सूरजने दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील रेल्वेच्या कार्यलयात नेऊन काळे यांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती. सुनील आणि सूरजने रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून विष्णू काळे, दीपक देशमुख आदी २७ बेरोजगारांकडून रोख, ऑनलाइन आणि विविध बँक खात्यांद्वारे वेळोवेळी एकूण ७३ लाख ८३ हजार रुपये घेतले होते. याचिकाकर्ता काळे याच्याकरिता ॲड. वैभव जी. देशमुख आणि सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एम. एम. नेरलीकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद