शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

गोदावरी नदीतून जलवाहतूक सुरू करणार, डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात कामास होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 23:39 IST

नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे.

औरंगाबाद : नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे. नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला नदीजोड प्रकल्प असून, याद्वारे दमनगंगेचे पाणी गोदावरीकडे वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे जायकवाडी धरणात जलसाठा वाढणार आहे. रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गाचा खर्च अधिक येतो, तुलनेने जलवाहतूक ही सर्वात स्वस्त व किफायतशीर असल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यादृष्टीने तयारी केली जात असून, या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. आराखडा सादर होताच डिसेंबरपर्यंत याचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यात जलवाहतुकीसाठी पोर्ट उभारणी करण्यास जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आॅफ इंडिया पुढाकार घेणार असून, नांदेड येथे पोर्ट उभारले जाणार आहे. जलवाहतुकीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा दावाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला. अकोला आणि बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांनी नदीजोड प्रकल्पात उल्लेखनीय काम केले आहे. हाच कित्ता मराठवाड्यात गिरविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकºयांनी माती दिल्यास त्यांना मोफत शेततळी बांधून दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.दहा लाख कोटींचा कामे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्तदेशभरात गत चार वर्षांत रस्ते बांधणीवर दहा लाख कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. यात झीरो टॉलरन्स करप्शन आणि पारदर्शकता ठेवण्यात आली. रस्ते काँक्रिटीकरणावर भर असून, उत्कृष्ट दर्जाच्या कामांमुळे किमान आगामी शंभर वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचे गडकरी म्हणाले...............................मनमाड-इंदूर मार्गाचे काम लवकरचमनमाड ते इंदूर रेल्वे मार्गाचे कामही आगामी तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. या मार्गामुळे दिल्ली ते चेन्नई, बंगळुरू यादरम्यानचे अंतर कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद