शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गोदावरी नदीतून जलवाहतूक सुरू करणार, डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात कामास होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 23:39 IST

नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे.

औरंगाबाद : नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे. नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला नदीजोड प्रकल्प असून, याद्वारे दमनगंगेचे पाणी गोदावरीकडे वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे जायकवाडी धरणात जलसाठा वाढणार आहे. रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गाचा खर्च अधिक येतो, तुलनेने जलवाहतूक ही सर्वात स्वस्त व किफायतशीर असल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यादृष्टीने तयारी केली जात असून, या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. आराखडा सादर होताच डिसेंबरपर्यंत याचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यात जलवाहतुकीसाठी पोर्ट उभारणी करण्यास जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आॅफ इंडिया पुढाकार घेणार असून, नांदेड येथे पोर्ट उभारले जाणार आहे. जलवाहतुकीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा दावाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला. अकोला आणि बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांनी नदीजोड प्रकल्पात उल्लेखनीय काम केले आहे. हाच कित्ता मराठवाड्यात गिरविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकºयांनी माती दिल्यास त्यांना मोफत शेततळी बांधून दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.दहा लाख कोटींचा कामे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्तदेशभरात गत चार वर्षांत रस्ते बांधणीवर दहा लाख कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. यात झीरो टॉलरन्स करप्शन आणि पारदर्शकता ठेवण्यात आली. रस्ते काँक्रिटीकरणावर भर असून, उत्कृष्ट दर्जाच्या कामांमुळे किमान आगामी शंभर वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचे गडकरी म्हणाले...............................मनमाड-इंदूर मार्गाचे काम लवकरचमनमाड ते इंदूर रेल्वे मार्गाचे कामही आगामी तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. या मार्गामुळे दिल्ली ते चेन्नई, बंगळुरू यादरम्यानचे अंतर कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद