शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

१५ दिवसांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करा; विद्यार्थी संवादातून रोहित पवारांचा सरकारला इशारा

By राम शिनगारे | Updated: August 16, 2023 18:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक भरतीसाठी येत्या काही दिवसात संबंधित मंत्र्यांची भेट देऊन भरतीप्रक्रिया सुरू करण्यासाठी १५ दिवसाची मुदत दिली जाईल. त्यानंतरही भरतीला सुरुवात न झाल्यास विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बेरोजगार युवकांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी केली. निमित्त होते विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर आज दुपारी अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे, प्रा. शेख जहुर, प्रा. बंडू सोमवंशी, विद्यापरिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांनी ' विद्यार्थी संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एमपीएससी आयोगाच्या परीक्षा, विविध विभागातील भरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस संस्थांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क, सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांकडून संशोधक विद्यार्थ्यांची होणाऱ्या कोंडीवर विविध विद्यार्थ्यांनी प्रश्नांची बरसात केली. यात परमेश्वर माने, महेंद्र मुंढे, धर्मराज जाधव, डॉ. गणेश बडे आदींनी समस्या मांडल्या. परमेश्वर माने याने परीक्षा शुल्काचा मुद्दा उपस्थित करीत विद्यार्थ्यांची होणारी लुट थांबविण्याची मागणी केली. तर डॉ. गणेश बडे यांनी प्राध्यापक, शिक्षकांची १०० टक्के भरतीची मागणी केली. 

विद्यार्थ्यांच्या मुद्यांवर बोलताना आ. रोहित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांच्या मागण्याकडे लक्ष वेधल्याचे सांगितले. तसेच टीसीएसकडून १ हजार रुपयांचे आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्यासाठी लढा उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, डॉ. राम चव्हाण, विठ्ठल गडदे, प्रा. अमोल औटे, दीपक सांळुके, डॉ. विश्वनाथ कोक्कर, डॉ. विनय लोमटे, डॉ. ह. नी. सोनकांबळे, डॉ. दीपक बहीर, अजय पवार आदींची उपस्थिती होती.

आश्वासनांच्या पुर्ततेसाठी कायदा हवाविद्यार्थी, युवकांच्या आंदोलन, उपोषणावेळी वेगवेगळे मंत्री, आमदार, राजकीय नेते विविध आश्वासने देऊन माघार घेण्यास भाग पाडतात. त्यानंतर त्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. मंत्र्यासह इतरांनी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी विधिमंडळात कायदा करा, त्यामुळे बेरोजगारांची होणारी फसवणूक थांबेल अशी मागणीच युवकांनी आ. रोहित पवार यांच्याकडे केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRohit Pawarरोहित पवार