शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

औरंगाबाद मनपाचे भोगवटा प्रमाणपत्र अभय योजनेवर मंथन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 18:11 IST

शहरातील २५० पेक्षा अधिक मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच देण्यात आलेले नाही. अभय योजना राबवून बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत योजना राबविण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमालमत्ता करातून दरवर्षी मनपाला ३०० कोटी रुपये मिळू शकतात.पाणीपट्टीतून १००, नगररचना विभागाकडून १००, तर ५० कोटी मालमत्ता विभागाकडून येऊ शकतात.महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद : शहरात विकास कामे करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. पगार व अत्यावश्यक कामांपुरताच पैसा उपलब्ध असतो. शहरातील २५० पेक्षा अधिक मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच देण्यात आलेले नाही. अभय योजना राबवून बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत योजना राबविण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

अस्थिर पदाधिकार्‍यांनी कधीच मनपाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ दिले नाही. मालमत्ता करातून दरवर्षी मनपाला ३०० कोटी रुपये मिळू शकतात. पाणीपट्टीतून १००, नगररचना विभागाकडून १००, तर ५० कोटी मालमत्ता विभागाकडून येऊ शकतात. मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे ठोस निर्णय कधी घेण्यात आले नाहीत. त्याचे परिणाम आज मनपासह औरंगाबादकरांना भोगावे लागत आहेत. दरवर्षी १ हजार ते १२०० कोटींचा अर्थसंकल्प तयार होतो. प्रत्यक्षात तिजोरीत ५०० ते ५५० कोटी रुपये येतात.

शासनाकडून जीएसटीपोटी महिन्याला २० कोटी रुपये प्राप्त होतात. या निधीवर कर्मचार्‍यांचा पगार, अत्यावश्यक कामे करण्यात येतात. मागील दहा वर्षांत महापालिकेने अनेक मोठ्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली आहे. या व्यावसायिकांनी मनपाकडून भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही. मोठ्या २५० इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिल्यास महापालिकेच्या तिजोरीत सहज १०० कोटी रुपये येऊ शकतात. त्यासाठी अगोदर मनपाला अभय योजना राबवावी लागणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

यापूर्वी मनपाने अनेकदा बिल्डरांना भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन केले; मात्र मनपाच्या या विनंतीला कधीच मान देण्यात आला नाही. आता या विषयावर अंतिम तोडगा काढण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१८ अशी दोन महिने ही योजना लागू राहील. त्यात बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही घोडेले यांनी नमूद केले.

दरवर्षी एक हजार इमारतींना मंजुरीमनपाच्या नगररचना विभागाकडे दरवर्षी १४०० ते १५०० फायली बांधकाम परवानगीसाठी येतात. त्यातील १ हजार ते १२०० फायली मंजूर होतात. छोट्या घरांच्या फायली पन्नास टक्क्यांहून अधिक असतात. उर्वरित फायली बांधकाम व्यावसायिकांच्या असतात. मागील दहा वर्षांमध्ये मनपाने ५०० ते ७०० मोठ्या गृहप्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील ९० टक्के व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद