शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाचे भोगवटा प्रमाणपत्र अभय योजनेवर मंथन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 18:11 IST

शहरातील २५० पेक्षा अधिक मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच देण्यात आलेले नाही. अभय योजना राबवून बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत योजना राबविण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमालमत्ता करातून दरवर्षी मनपाला ३०० कोटी रुपये मिळू शकतात.पाणीपट्टीतून १००, नगररचना विभागाकडून १००, तर ५० कोटी मालमत्ता विभागाकडून येऊ शकतात.महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद : शहरात विकास कामे करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. पगार व अत्यावश्यक कामांपुरताच पैसा उपलब्ध असतो. शहरातील २५० पेक्षा अधिक मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच देण्यात आलेले नाही. अभय योजना राबवून बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत योजना राबविण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

अस्थिर पदाधिकार्‍यांनी कधीच मनपाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ दिले नाही. मालमत्ता करातून दरवर्षी मनपाला ३०० कोटी रुपये मिळू शकतात. पाणीपट्टीतून १००, नगररचना विभागाकडून १००, तर ५० कोटी मालमत्ता विभागाकडून येऊ शकतात. मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे ठोस निर्णय कधी घेण्यात आले नाहीत. त्याचे परिणाम आज मनपासह औरंगाबादकरांना भोगावे लागत आहेत. दरवर्षी १ हजार ते १२०० कोटींचा अर्थसंकल्प तयार होतो. प्रत्यक्षात तिजोरीत ५०० ते ५५० कोटी रुपये येतात.

शासनाकडून जीएसटीपोटी महिन्याला २० कोटी रुपये प्राप्त होतात. या निधीवर कर्मचार्‍यांचा पगार, अत्यावश्यक कामे करण्यात येतात. मागील दहा वर्षांत महापालिकेने अनेक मोठ्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली आहे. या व्यावसायिकांनी मनपाकडून भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही. मोठ्या २५० इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिल्यास महापालिकेच्या तिजोरीत सहज १०० कोटी रुपये येऊ शकतात. त्यासाठी अगोदर मनपाला अभय योजना राबवावी लागणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

यापूर्वी मनपाने अनेकदा बिल्डरांना भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन केले; मात्र मनपाच्या या विनंतीला कधीच मान देण्यात आला नाही. आता या विषयावर अंतिम तोडगा काढण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१८ अशी दोन महिने ही योजना लागू राहील. त्यात बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही घोडेले यांनी नमूद केले.

दरवर्षी एक हजार इमारतींना मंजुरीमनपाच्या नगररचना विभागाकडे दरवर्षी १४०० ते १५०० फायली बांधकाम परवानगीसाठी येतात. त्यातील १ हजार ते १२०० फायली मंजूर होतात. छोट्या घरांच्या फायली पन्नास टक्क्यांहून अधिक असतात. उर्वरित फायली बांधकाम व्यावसायिकांच्या असतात. मागील दहा वर्षांमध्ये मनपाने ५०० ते ७०० मोठ्या गृहप्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील ९० टक्के व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद