शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 12:36 IST

St Strike जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी २२ साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या साध्या म्हणजेच लाल बसेस धावण्याचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २१ शिवशाही, ५१ साध्या (लाल) आणि ६ हिरकणी बस धावल्या.

जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी २२ साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली आहे. जिल्ह्यात ६०१ एस.टी. कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. हजर असलेल्या चालक-वाहकांच्या मदतीने मंगळवारी दिवसभरात ७८ बसगाड्या धावल्या. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच आगारांतून एस.टी. धावली. या ७८ बसगाड्यांनी दिवसभरात ३१७ फेऱ्या केल्या. यातून ६११६ प्रवाशांनी प्रवास केला. अजिंठा लेणीत सर्वाधिक २ हजार ६५५ प्रवाशांनी प्रवास केला. जिल्ह्यातील एसटी कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर ( St Strike ) आहेत. एसटी शासनात विलीन करण्याच्या मागणीसंदर्भात ५ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंत संपावर ठाम राहण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

२० कर्मचाऱ्यांना नारळऔरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी एसटी महामंडळाकडून एकाही कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत २० संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांवर पोलिसांची नजरएसटी राज्य शासनात विलीन करण्यात यावी, अथवा आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सोमवारी एका निवेदनाद्वारे सिडको बसस्थानकातील २०१ एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यासंदर्भात पोलिसांकडून मंगळवारी माहिती घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरात येण्याचे टाळले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबादstate transportएसटी