शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

एसटी बस गेली ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’; प्रवाशांचे प्रचंड हाल, 'खासगी'ची मनमानी भाडेवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:13 IST

औरंगाबादेतून तब्बल २५० बस मुंबईतील बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी गेल्या होत्या.  

औरंगाबाद : अर्धा तास झाला... एक तास उलटला... तरी बस येईना, मगं कोणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेऱ्या मारत होता, तर कोणी थेट जमिनीवर बसून बसची वाट पाहत होता. बऱ्याच वेळेनंतर एखादी बस येताच प्रवाशांचा तिच्याभोवती एकच गराडा पडत होता. दसऱ्या मेळाव्यासाठी औरंगाबादेतून २५० बस मुंबईला गेल्याने मंगळवारी प्रवाशांचे असे प्रचंड हाल झाले. एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे आहे की ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’ हे आहे, असा सवाल प्रवाशांनी केला.

मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी मुंबईला औरंगाबाद विभागाच्या २५० बस पाठविण्यात आल्या. प्रत्येक आगारातील काही बस यासाठी रवाना करण्यात आल्या. सकाळीच सिल्लोड, कन्नडमार्गे बहुतांश बसगाड्या मुंबईला रवाना झाल्या. औरंगाबाद विभागाबरोबर जालना विभागाच्या ७५ आणि अहमदनगर विभागाच्या २५ बसही रवाना झाल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील ५३६ पैकी २५० बस कमी झाल्याने सकाळपासूनच प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या गुलबर्गा, विजापूर, गाणगापूर आदी बस रद्द झाल्या. गंगापूर, पैठणसह ग्रामीण भागांतील बसगाड्यांची सेवा विस्कळीत झाली. अशा परिस्थितीत खासगी वाहतूकदार बसस्थानकात घुसून प्रवासी बाहेर नेत होते. बसगाड्या नसल्याची संधी साधत खासगी वाहतूकदार मनमानी भाडेवसुली करीत होते.

एसटी’चे अधिकारी म्हणाले...एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, निवडणूक, गौरी-गणपतीच्या कालावधीतही बस पाठविण्यात येेतात. त्याचप्रमाणे मुंबईसाठीही प्रासंगिक करारावर बस पाठविण्यात आल्या आहेत. इतर विभागाची बससेवा सुरळीत आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

अर्धा तास ताटकळलोपैठणला जाण्यासाठी बसस्थानकात आलो; पण अर्धा तास झाला तरी बस आलेली नाही. बस कधी येईल, हे कोणी सांगतही नव्हते. माझ्यासह अनेक जण ताटकळले. - भाऊसाहेब जायभाय, प्रवासी

मुंबईला बस गेल्याचे कळलेदुपारी १२ वाजता बसस्थानकात आलो. साडेबारा वाजून गेले तरी बस येण्याचा पत्ता नाही. इतर दिवशी थोड्या थोड्या अंतराने पैठणच्या बस येत होत्या. मुंबईला बस गेल्याने उशीर होत असल्याचे समजले.- नीलेश हजारे, प्रवासी

औरंगाबाद विभागातून गेलेल्या बस आगार - बसची संख्यासिडको बसस्थानक - ४८ मध्यवर्ती बसस्थानक - ४२ पैठण - ३०सिल्लोड - ३६ वैजापूर - २८ कन्नड - २८ गंगापूर - २५ सोयगाव - १३ एकूण - २५०

 

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादDasaraदसरा