शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

SSC Result 2020: औरंगाबाद विभागात पुन्हा मुलींची बाजी; जालना जिल्हा ठरला अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:14 IST

औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देनिकालावर भूगोलच्या पेपरमुळे परिणाम 

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी ( दि.२९ ) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षीही विभागातून मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. राज्यात औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 

कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल यावर्षी जुलैच्या शेवटी जाहीर झाला. औरंगाबाद विभागातून १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १ लाख ६९ हजार ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

निकालावर भूगोलच्या पेपरमुळे परिणाम दहावीचा परीक्षा कालावधी ३ मार्च ते २३ मार्च असा होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेवटचा पेपर भुगोल पेपर रद्द करण्यात आला होता. यामुळे भुगोल विषयांचं गुणदान कसं करायचं हा तिढा होता. अखेर मंडळाने निर्णय घेत बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं भुगोल विषयाच्यागुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. 

विभागात जालना जिल्ह्याची बाजीऔरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा सर्वाधिक निकाला लागला आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० हजार ४३३ मुले उत्तीर्ण झाली. औरंगाबाद ९२.१०, बीड ९१.२४, परभणी ९०.६६ तर हिंगोली जिल्ह्याचा निकाला ९१.९४ टक्के लागला आहे. 

पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद