शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2020: औरंगाबाद विभागात पुन्हा मुलींची बाजी; जालना जिल्हा ठरला अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:14 IST

औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देनिकालावर भूगोलच्या पेपरमुळे परिणाम 

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी ( दि.२९ ) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षीही विभागातून मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. राज्यात औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 

कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल यावर्षी जुलैच्या शेवटी जाहीर झाला. औरंगाबाद विभागातून १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १ लाख ६९ हजार ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

निकालावर भूगोलच्या पेपरमुळे परिणाम दहावीचा परीक्षा कालावधी ३ मार्च ते २३ मार्च असा होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेवटचा पेपर भुगोल पेपर रद्द करण्यात आला होता. यामुळे भुगोल विषयांचं गुणदान कसं करायचं हा तिढा होता. अखेर मंडळाने निर्णय घेत बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं भुगोल विषयाच्यागुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. 

विभागात जालना जिल्ह्याची बाजीऔरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा सर्वाधिक निकाला लागला आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० हजार ४३३ मुले उत्तीर्ण झाली. औरंगाबाद ९२.१०, बीड ९१.२४, परभणी ९०.६६ तर हिंगोली जिल्ह्याचा निकाला ९१.९४ टक्के लागला आहे. 

पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद