शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचे १७ रोजी लोकार्पण; पर्यटन राजधानीच्या वैभवात पडली भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:38 IST

शहराच्या वैभवात आणखी भर घालणारा भव्यदिव्य श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराच्या वैभवात आणखी भर घालणारा भव्यदिव्य श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त १६ ते १८ हे तीन दिवस आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत श्रीरामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद यांनी सांगितले की, जगाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात श्रीरामकृष्ण परमहंस हे अद्वितीय धर्म समन्वयक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानवमात्रांच्या शांततेसाठी आणि कल्याणासाठी वेचले. त्यांचे प्रमुख शिष्य स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरूचा अमर संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ध्यान मंदिरात श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या  मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 

१६ ते १८ नोव्हेंबर हे तीन दिवस सोहळा होणार असून, १७ रोजी मुख्य लोकार्पण सोहळ्याला सकाळी ९ वाजता सुरुवात होईल. यात बेलूर येथील रामकृष्ण मठाचे ३ वरिष्ठ उपाध्यक्ष स्वामी वागिशानंद महाराज, स्वामी गौतमानंद महाराज आणि स्वामी शिवमयानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच सरचिटणीस स्वामी बलभद्रानंद महाराज व देश-विदेशातून आलेल्या ३५० साधूंची तसेच महापौर नंदकुमार घोडेले यांचीही व्यासपीठावर उपस्थिती राहणार आहे. सुमारे ५ हजार भाविक या तीनदिवसीय सोहळ्यात सहभागी होतील. ४० ज्येष्ठ साधूंची व्याख्याने होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

१६ रोजी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रेरक घटना, साहित्यातले उतारे, वचने नाट्यरूपात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘संन्यासीचे विवेकानंद चरित्र चिंतन’ विषयावरील व्याख्यान व स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील नाटक सादर करण्यात येणार आहे.  १७ रोजी सायंकाळी ‘महाराष्ट्राची अद्वैत भक्ती आणि शौर्य परंपरा’ विषयावरील नाटिका व १८ रोजी ‘रामकृष्ण भक्त संमेलन’, ‘भक्तवत्सल श्रीरामकृष्ण’ या विषयांसह विविध कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता होणार आहे. 

भव्य मंडपाची उभारणीश्रीरामकृष्ण ध्यान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंदिराच्या बाजूला असलेल्या ७ एकर जागेवर ३५० फूट लांब व १४० फूट रूंद तसेच २४ फूट उंचीचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे ५ हजारपेक्षा अधिक भाविक येथे बसतील. बीड बायपास रस्त्यावरील श्रीरामकृष्ण मिशन आश्रमाच्या वतीने उभारण्यात आलेली हे श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराची भव्य वास्तू आकर्षण ठरत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनspiritualअध्यात्मिक