शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 17:18 IST

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत.

पैठण : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झालेला  असून उसाच्या मापात पाप होत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार  साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कारखान्याच्या वजन काट्या संदर्भात आक्षेप असल्यास शेतकऱ्यांनी भरारी पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करणार आहे. एखाद्या साखर कारखान्यावर वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार  प्राप्त झाल्यावर लगेच त्या ठिकाणी वजन काट्याची तपासणी करुन गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण. बारामती अँग्रो कन्नड, घ्रुष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, खुलताबाद. रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवा ता पैठण. मुक्तेश्वर शुगर लि. धामोरी ता गंगापूर. छत्रपती संभाजी राजे साखर कारखाना चितेपिंपळगाव ता औरंगाबाद. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. 

शेतकऱ्यांनी तक्रार करावीयंदा सरासरी पेक्षा जास्त ऊस शेतकऱ्यांकडे असल्याने कारखाने ऊस घेऊन जातील का ? या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत. कारखान्यावर उसाच्या वजन काट्यावर आक्षेप घेण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. मापा संदर्भात आक्षेप असल्यास पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन पथकाचे सदस्य चंद्रकांत झारगड यांनी केले आहे. 

भरारी पथके करणार तपासणी प्रत्येक साखर कारखान्यांवर वजनकाटय़ाजवळ २०-२० किलोची वजने असतात. मात्र शेतकरी कधीच काटा करताना त्या ठिकाणी जात नाही अथवा त्या वजनकाटय़ावर ती वजने ठेवून साखर कारखान्यातील काटय़ाची तपासणी करण्याचे धाडस दाखवत नाही. म्हणून भरारी पथकाने वेळोवेळी तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच तपासणी दरम्यान पथकातील शेतकरी प्रतिनिधी उपलब्ध न झाल्यास कारखान्यावर उपस्थित दोन शेतकऱ्यांना पथकात सहभागी करून घ्यावे असे आदेशात म्हटले आहे.

कारखाना निहाय भरारी पथक सदस्य...- शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा ता. पैठण : तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक ( पाचोड ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ), लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी माऊली मुळे.- संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण : तहसीलदार ( पैठण ) , पोलीस निरीक्षक ( पैठण ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ) , ए.जी. जाधव,लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड.- बारामती अँग्रो लिमिटेड, कन्नड : तहसीलदार कन्नड, पोलीस निरीक्षक कन्नड, वैधमापन निरीक्षक पैठण, लेखापरीक्षक, व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड. - घ्रुष्णेश्वर साखर कारखाना, खुलताबाद : तहसीलदार खुलताबाद, पोलीस निरीक्षक खुलताबाद, वैधमापन निरीक्षक खुलताबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रशेखर साळुंके. - मुक्तेश्वर साखर कारखाना, गंगापूर : तहसीलदार गंगापूर, पोलीस निरीक्षक गंगापूर, वैधमापन निरीक्षक गंगापूर, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी शिवाजीराव साबळे. - छत्रपती संभाजी राजे कारखाना चितेपिंपळगाव : तहसीलदार औरंगाबाद, पोलीस निरीक्षक औरंगाबाद, वैधमापन निरीक्षक औरंगाबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी आरेफ पठाण. - सिध्देश्वर साखर कारखाना, सिल्लोड : तहसीलदार सिल्लोड, पोलीस निरीक्षक सिल्लोड, वैधमापन निरीक्षक सिल्लोड, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी के जी साबळे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी