शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 17:18 IST

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत.

पैठण : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झालेला  असून उसाच्या मापात पाप होत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार  साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कारखान्याच्या वजन काट्या संदर्भात आक्षेप असल्यास शेतकऱ्यांनी भरारी पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करणार आहे. एखाद्या साखर कारखान्यावर वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार  प्राप्त झाल्यावर लगेच त्या ठिकाणी वजन काट्याची तपासणी करुन गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण. बारामती अँग्रो कन्नड, घ्रुष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, खुलताबाद. रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवा ता पैठण. मुक्तेश्वर शुगर लि. धामोरी ता गंगापूर. छत्रपती संभाजी राजे साखर कारखाना चितेपिंपळगाव ता औरंगाबाद. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. 

शेतकऱ्यांनी तक्रार करावीयंदा सरासरी पेक्षा जास्त ऊस शेतकऱ्यांकडे असल्याने कारखाने ऊस घेऊन जातील का ? या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत. कारखान्यावर उसाच्या वजन काट्यावर आक्षेप घेण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. मापा संदर्भात आक्षेप असल्यास पथकाकडे तक्रार करावी असे आवाहन पथकाचे सदस्य चंद्रकांत झारगड यांनी केले आहे. 

भरारी पथके करणार तपासणी प्रत्येक साखर कारखान्यांवर वजनकाटय़ाजवळ २०-२० किलोची वजने असतात. मात्र शेतकरी कधीच काटा करताना त्या ठिकाणी जात नाही अथवा त्या वजनकाटय़ावर ती वजने ठेवून साखर कारखान्यातील काटय़ाची तपासणी करण्याचे धाडस दाखवत नाही. म्हणून भरारी पथकाने वेळोवेळी तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच तपासणी दरम्यान पथकातील शेतकरी प्रतिनिधी उपलब्ध न झाल्यास कारखान्यावर उपस्थित दोन शेतकऱ्यांना पथकात सहभागी करून घ्यावे असे आदेशात म्हटले आहे.

कारखाना निहाय भरारी पथक सदस्य...- शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा ता. पैठण : तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक ( पाचोड ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ), लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी माऊली मुळे.- संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण : तहसीलदार ( पैठण ) , पोलीस निरीक्षक ( पैठण ) , वैध मापन निरीक्षक ( पैठण ) , ए.जी. जाधव,लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड.- बारामती अँग्रो लिमिटेड, कन्नड : तहसीलदार कन्नड, पोलीस निरीक्षक कन्नड, वैधमापन निरीक्षक पैठण, लेखापरीक्षक, व शेतकरी प्रतिनिधी चंद्रकांत झारगड. - घ्रुष्णेश्वर साखर कारखाना, खुलताबाद : तहसीलदार खुलताबाद, पोलीस निरीक्षक खुलताबाद, वैधमापन निरीक्षक खुलताबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी चंद्रशेखर साळुंके. - मुक्तेश्वर साखर कारखाना, गंगापूर : तहसीलदार गंगापूर, पोलीस निरीक्षक गंगापूर, वैधमापन निरीक्षक गंगापूर, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी शिवाजीराव साबळे. - छत्रपती संभाजी राजे कारखाना चितेपिंपळगाव : तहसीलदार औरंगाबाद, पोलीस निरीक्षक औरंगाबाद, वैधमापन निरीक्षक औरंगाबाद, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी आरेफ पठाण. - सिध्देश्वर साखर कारखाना, सिल्लोड : तहसीलदार सिल्लोड, पोलीस निरीक्षक सिल्लोड, वैधमापन निरीक्षक सिल्लोड, लेखापरीक्षक व शेतकरी प्रतिनिधी के जी साबळे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी