शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

पैठण रोडवर भीषण अपघात; सुसाट ट्रक वाहनांना उडवत गेला, एकाचा मृत्यू, १६ जखमी

By सुमित डोळे | Updated: January 19, 2024 20:16 IST

सुसाट ट्रक उतारावरून थेट ठप्प वाहतुकीत घुसला, ६ दुचाकी, ३ कार, ३ टेम्पो, एका सहलीच्या बसला धडकला

- अमेय पाठकछत्रपती संभाजीनगर : सोलापूर- धुळे महामार्गावरून बीडच्या दिशेने शहरात आलेला सुसाट ट्रक वाल्मी चौकात थेट ठप्प झालेल्या वाहतुकीत घुसला. वाहनांना आडवे उभे उडवत गेला. वाहने उभीच असल्याने ट्रकच्या धडकेत जवळपास १३ वाहनांचा चुराडा झाला. यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू होऊन अक्षरशः डोक्याचा भुगा झाला, तसेच ४ गंभीर, तर १२ वाहनचालक किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता झालेल्या भीषण अपघाताने सगळेच हादरून गेले.

सध्या पैठण रस्त्याचे काम सुरू आहे. शिवाय, सोलापूर- धुळे महामार्गाची शहरातील मार्गाची खालील बाजू गेल्या अनेक दिवसांपासून मातीचा ढिगारा लावून बंद करण्यात आली आहे. परिणामी, वाल्मी चौकात पुलाखाली रोज सायंकाळी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. शुक्रवारीदेखील सायंकाळी ६ वाजेपासून वाहतूक ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटे अनेक चालक वाहने बंद करून उभी होती. साडेसात वाजेच्या सुमारास बीडच्या दिशेने आलेला ट्रक महामार्गावरील पूल उतरला व वाल्मी चौकाच्या दिशेने खाली उतरला. उतारावर मात्र त्याच सुसाट वेगात उतरून ट्रकने सुरुवातीला एका इनोव्हाला उडवले. त्यानंतर तो थेट समोर ठप्प झालेल्या वाहतुकीत घुसला. वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत असलेल्या वाहनांना ट्रक थेट चिरडत गेला.

...अन् सहलीच्या विद्यार्थ्यांचा बालंबाल जीव वाचलाट्रकचा वेग इतका भीषण होता की, त्याने ६ दुचाकी, ३ कार, ३ टेम्पोंचा चुराडा केला. याच गर्दीत अडकलेली सहलीच्या विद्यार्थ्यांची बस मात्र बालंबाल वाचली. त्यात जवळपास ५२ पेक्षा अधिक विद्यार्थी होते. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली. मात्र, सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक सर्जेराव सानप, देवीदास शेवाळे, वाहतूकचे सहायक निरीक्षक सचिन मिर्धे यांनी धाव घेतली.

मृत्यू आणि जखमीया अपघातात मूळ धाराशिव च्या मनीषा पद्माकर सिंगनापूरे (४५, रा. चितेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर शफिक शेख (रा. संजयनगर), इरफान शेख (रा. छावणी), अब्दुल बासिद (रा. वडगाव), रहीम खान पठाण (संजयनगर), माया बोर्डे, पिंटू बोर्डे (दोघे रा. प्रियदर्शनी), इंदिरा मगर, भगवान गव्हाणे (रा. जवाहर कॉलनी), मयूर लावरे (रा. पैठण गेट), हृषिकेश चांगुलपाय (रा. नक्षत्रवाडी), सायली दानवे, चंद्रकांत डांगरे, सायली डांगरे हे जखमी झाले. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.

अंबाबाईची कृपा, माझे कुटुंब एका इंचाच्या अंतराने वाचलेगेवराई तांड्याचे रहिवासी रणजित राठोड यांनी अपघात प्रत्यक्ष पाहिला. या भीषण अपघाताचे वर्णन करताना अंग थरथरत होते तर डोळ्यांत पाण्याच्या धारा वाहत होत्या. मी इनोव्हा ( एम एच २० डिजे ३९४६) कार ने आई, पत्नी, मुलांना घेऊन तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सायंकाळी शहरात आलो. तांड्याकडे जाण्यासाठी वाल्मी नाक्यावर वळण घेतले व मोठी वाहतूक जॅम झाली होती. १५-२० मिनिटे एकाच ठिकाणी गाड्या थांबून होत्या. आईसोबत माझ्या गप्पा सुरू असतानाच मोठा आवाज आला आणि माझ्या गाडीला धक्का लागला. काय झालंय, कळायच्या आत सुसाट ट्रक वाहने चिरडून जात होता. पत्नी, आई किरकोळ जखमी झाल्या. एक इंच जरी अलीकडे असतो तर माझं कुटुंब संपलं असतं. ‘आई अंबाबाई’ची कृपेने माझे कुटुंब वाचले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात