शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 11:15 PM

औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. सदरील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. त्यावरून चालणेही अवघड झाले असून, वाहन जाणे तर सध्या अवघड झालेले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रोडावली आहे. याप्रकरणी खा. राजकुमार धूत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देखा. राजकुमार धूत : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून दिले निवेदन

औरंगाबाद : औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. सदरील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. त्यावरून चालणेही अवघड झाले असून, वाहन जाणे तर सध्या अवघड झालेले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रोडावली आहे. याप्रकरणी खा. राजकुमार धूत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे.खा. धूत यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, औरंगाबाद ते जळगाव रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू झाले. मात्र, काम कासवगतीने सुरू आहे. रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होतो आहे. धूळ आणि चिखलामुळे आरोग्यासह शेतकऱ्यांना शेतमालाच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अजिंठा लेण्यांना भेट देणाºया पर्यटकांनी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे येण्याचे टाळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, पर्यटकांनी लेण्यांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे जगभर पर्यटकांमध्ये नकारात्मक संदेश जात आहे. याचा उद्योगवाढीवर देखील परिणाम होतो आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना लगेच फोनद्वारे संपर्क करून कामाला गती देण्याचे आदेश दिले.शिर्डीकडे जाणाºया रस्त्याचा दर्जा वाढवाशिर्डी हे देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. औरंगाबाद ते ए.एस. क्लब ते लासूरस्टेशन ते वैजापूर-शिर्डीमार्गे जाणाºया पर्यटक आणि भाविकांची संख्या मोठी आहे; परंतु तो रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याचा दर्जा वाढवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी खा. धूत यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली.

टॅग्स :Aurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकroad safetyरस्ते सुरक्षा