शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

नांदेड विभागात वाढणार रेल्वेंची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:15 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देसुरक्षेला प्राधान्य : १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे होणार काम

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.एप्रिल २००३ मध्ये हैदराबाद विभागातून वेगळे होऊन नांदेड विभाग अस्तित्वात आला. नांदेड रेल्वे विभाग हा प्रामुख्याने सिंगल लाईन म्हणजे एकेरी मार्ग असलेला विभाग आहे. त्यामुळे मोठा लाईन ब्लॉक घेऊन काम करणे अवघड होते. मोठ्या लाईन ब्लॉकने बऱ्याच रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होतो. यामुळेच नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी गेल्या १५-१६ वर्षांत रेल्वे रूळ बदलण्याचे कार्य हाती घेऊ शकले नाहीत. यामुळे सध्याच्या रेल्वे रुळावरून रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने (वेगाने) धावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून रेल्वेगाड्यांची गती वाढविण्याची आणि त्या नियोजित वेळेवर चालविण्याची मागणी होत आहे.त्यामुळे नांदेड विभागाने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेंची गती वाढविण्यासाठी रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे कार्य लवकरच हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घ्यावा लागेल. यामुळे काही रेल्वेगाड्या धावतील, काही रेल्वेगाड्यांची वेळ बदलावी लागेल. गरज पडल्यास काही गाड्या रद्द कराव्या लागतील. त्यासंदर्भात प्रवाशांना विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे.जनतेने सहकार्य करावेसुरक्षेत आणि सेवेत वाढ करण्यासाठी नांदेड विभागाकडून रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम सुरूकरण्यात येत आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे