शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड विभागात वाढणार रेल्वेंची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:15 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देसुरक्षेला प्राधान्य : १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे होणार काम

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.एप्रिल २००३ मध्ये हैदराबाद विभागातून वेगळे होऊन नांदेड विभाग अस्तित्वात आला. नांदेड रेल्वे विभाग हा प्रामुख्याने सिंगल लाईन म्हणजे एकेरी मार्ग असलेला विभाग आहे. त्यामुळे मोठा लाईन ब्लॉक घेऊन काम करणे अवघड होते. मोठ्या लाईन ब्लॉकने बऱ्याच रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होतो. यामुळेच नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी गेल्या १५-१६ वर्षांत रेल्वे रूळ बदलण्याचे कार्य हाती घेऊ शकले नाहीत. यामुळे सध्याच्या रेल्वे रुळावरून रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने (वेगाने) धावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून रेल्वेगाड्यांची गती वाढविण्याची आणि त्या नियोजित वेळेवर चालविण्याची मागणी होत आहे.त्यामुळे नांदेड विभागाने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेंची गती वाढविण्यासाठी रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे कार्य लवकरच हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घ्यावा लागेल. यामुळे काही रेल्वेगाड्या धावतील, काही रेल्वेगाड्यांची वेळ बदलावी लागेल. गरज पडल्यास काही गाड्या रद्द कराव्या लागतील. त्यासंदर्भात प्रवाशांना विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे.जनतेने सहकार्य करावेसुरक्षेत आणि सेवेत वाढ करण्यासाठी नांदेड विभागाकडून रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम सुरूकरण्यात येत आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे