शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

नांदेड विभागात वाढणार रेल्वेंची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:15 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देसुरक्षेला प्राधान्य : १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे होणार काम

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.एप्रिल २००३ मध्ये हैदराबाद विभागातून वेगळे होऊन नांदेड विभाग अस्तित्वात आला. नांदेड रेल्वे विभाग हा प्रामुख्याने सिंगल लाईन म्हणजे एकेरी मार्ग असलेला विभाग आहे. त्यामुळे मोठा लाईन ब्लॉक घेऊन काम करणे अवघड होते. मोठ्या लाईन ब्लॉकने बऱ्याच रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होतो. यामुळेच नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी गेल्या १५-१६ वर्षांत रेल्वे रूळ बदलण्याचे कार्य हाती घेऊ शकले नाहीत. यामुळे सध्याच्या रेल्वे रुळावरून रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने (वेगाने) धावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून रेल्वेगाड्यांची गती वाढविण्याची आणि त्या नियोजित वेळेवर चालविण्याची मागणी होत आहे.त्यामुळे नांदेड विभागाने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेंची गती वाढविण्यासाठी रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे कार्य लवकरच हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घ्यावा लागेल. यामुळे काही रेल्वेगाड्या धावतील, काही रेल्वेगाड्यांची वेळ बदलावी लागेल. गरज पडल्यास काही गाड्या रद्द कराव्या लागतील. त्यासंदर्भात प्रवाशांना विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे.जनतेने सहकार्य करावेसुरक्षेत आणि सेवेत वाढ करण्यासाठी नांदेड विभागाकडून रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम सुरूकरण्यात येत आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे