शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोयाबीन गाठणार पाच हजार रुपयांचा टप्पा; शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आशेचे किरण

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 2, 2023 18:37 IST

अनेक शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.

छत्रपती संभाजीनगर : आडत बाजारात सोयाबीनचे भाव थोडे वाढल्याने शेतकऱ्यांच्या मनात आशेचे किरण निर्माण झाले आहेत. आता ४८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव असले, तरी येत्या काही दिवसांत ५ हजारांपर्यंत भाव मिळू शकतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.

सोयाबीनचे दर का वाढले :सोयाबीनला यंदा भाव मिळत नव्हता. ४५०० रुपये प्रतिक्विंटलच्या आत विकले जात होते. सोयाबीनसारख्या पिकांना भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय. निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, अशी चिंता पसरली असताना मागील चार ते पाच दिवसांपासून सोयाबीनचे भाव वाढू लागले आहेत. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वधारले आहेत. परिणामी क्विंटलमागे १०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

आणखी दीड ते दोन महिने होईल आवकमागील १५ दिवसांपासून नवीन सोयाबीनची आवक जाधववाडीतील कृउबा समिती आडत बाजारात होत आहे. दररोज २६० ते ४०० क्विंटलपर्यंत सोयाबीन येत आहे. आज ४६०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. जाधववाडीतील सोयाबीन लातूर, धुळे, इंदापूर येथील सोयाबीन प्लांटवाले खरेदी करत आहेत.- विजय पांडे, खरेदीदार

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड