शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोयाबीन पेरताय, बक्कळ कमाईसाठी वापरा 'टोकन पेरा' पद्धत, कृषी विभागानेही दिला सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 18:00 IST

खरीप हंगामात घरच्या बियाण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत

- योगेश पायघनऔरंगाबाद : नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. मात्र बियाणे व उत्पादन खर्च वाढवून सोयाबीन पीक घेण्याबद्दल अनेक प्रयोग केले जात आहे. शेतकऱ्यांत मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून यावर्षी टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती सुरू आहे. महागड्या बियाण्यावरील खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी टोकन पद्धतीवर शेतकऱ्यांचा अधिक भर आहे.

जिल्ह्यात खरीपाचे ६.५६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असून यावर्षी कपाशी ३.६१ लाख हेक्टर, मका १.७९ लाख हेक्टर, सोयाबीन ३३ हजार ८०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. २५ हजार २३० क्विंटल बियाण्याची आवश्यकता भासणार आहे. ग्राम बीजोत्पादन मोहिमेतून शेतकऱ्यांनी ६८०० क्विंटल बियाणे राखून ठेवले आहे. आतापर्यंत ३४०० क्विंटल बियाणे विक्री झालेली आहे. सोयाबीनची पेरणी पारंपरिक पद्धतीने न करता बीबीएफल सरी वरंभा किंवा टोकन पद्धतीने केल्यास अत्यंत फायदेशीर ठरते. टोकन पद्धतीने पेरणीत बियाण्याची बचत आणि उत्पन्नात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.

३४ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरा अपेक्षितजिल्ह्यात खरीपाचे ६.५६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असून सोयाबीन ३३ हजार ८०० हेक्टरवर लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी साेयाबीनचा जिल्ह्यातील पेरा वाढण्याचा अंदाज आहे.

कोणत्या पेरणीचा किती फायदा?पारंपरिक पेरणी : पारंपरिक पेरणीला आता शेतकऱ्यांकडून विराम मिळाला असून ट्रॅक्टरद्वारे किंवा बैलांद्वारे पेरणी केल्यावर त्यात बियाणे अधिक लागते. अंतर योग्य राहत नसल्याने उत्पादनात घट येते.ट्रॅक्टरचलित बीबीएफ : ट्रॅक्टरचलित बीएफए टोकन पेरणीत खर्च कमी येतो. योग्य अंतर, खोलीवर पेरणी झाल्याने उगवण चांगली येते. रूंद सरी वरंभा पद्धतीमुळे जास्त पाऊस झाल्यास पाणी वाहून जाते तर कमी पावसात ओलावा कायम राहते.बहुपीक पेरणी : यात आंतरपीक पद्धतीनुसार दोन पिके एकाच वेळी घेता येतात. तुरीसोबत साेयाबीन पेरणी कोरडवाहू भागातील शेतकरी करतात. सोयाबीन काढल्यावर तुरीचे पीक येते. मात्र, पेरणी व मजुरीचा खर्च अधिक आहे.सरी वरंभ्यावर टोकन पद्धत : चार फुटापर्यंत सरी घेऊन दोन्ही बाजूने वरंभा करून वरंभ्यावर लागवड करतात. दोन रोपांमध्ये विशिष्ट अंतर ठेवले जाते. त्यामुळे आंतरमशागत चांगली करता येते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद