शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात १० टक्के वाढ होणार

By admin | Updated: May 27, 2014 00:48 IST

कळमनुरी : तालुक्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे पेरणीक्षेत्र १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय बियाणांची टंचाई भासणार असल्याने शेतकर्‍यांनी घरगुती बियाणेच

कळमनुरी : तालुक्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे पेरणीक्षेत्र १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय बियाणांची टंचाई भासणार असल्याने शेतकर्‍यांनी घरगुती बियाणेच उगवणक्षमता तपासून पेरण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. सोयाबीनला पेरणी व लागवड खर्च कमी, हमीभाव असल्याने यावर्षी सोयाबीन वाढण्याची शक्यता आहे. तर कापसाचे पेरणीक्षेत्र १० टक्के कमी होण्याची शक्यता आहे. लागवडीला खर्च जास्त, फवारणी, खते आदींना खर्च जास्त व हमीभाव कमी, मजुरांची कमतरता, लागवड ते वेचणीपर्यंत जास्त खर्च येत असल्याने यावर्षी हा पेरा १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांकडे बैलजोडी नसल्याने व बैलजोडीची किंमत लाखांच्या जवळपास पोहोचल्याने त्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याने कापसापेक्षा सोयाबीन पेरणीकडेच शेतकर्‍यांचा कल दिसत आहे. तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ७७ हजार हेक्टर आहे. या पैकी ३७ हजार हेक्टरवर सोयाबीन तर २५ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांनी दिली. गावोगावी शेतकर्‍यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन कृषी खात्यामार्फत करण्यात आले आहे. बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बियाणे पेरावे, बियाण्यांची बीज प्रक्रियाही करणे गरजेचे असल्याचे कृषी अधिकार्‍यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. बाजारातून कोणतेही बियाणे आणले तरी त्याची उगवणशक्ती तपासूनच पेरण्याचे आवाहनही कृषी खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. सोयाबीनची उपलब्धता असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या कृषी सहाय्यकांनी तयार केल्या आहेत. इतर शेतकर्‍यांना हे बियाणे कामी पडणार आहे. यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे. शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेले सोयाबीनच इतर शेतकर्‍यांना बियाणे म्हणून कामी पडणार आहे. सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्के असली तरी हे बियाणे पेरण्यास कमी पडणार आहे. गावोगावी शेतकरी मेळावे घेवून मंडळ कृषी अधिकारी टोंपे, राठोड, वाईकर, खुपसे, गिरी, आर.एस. भिसे, पोहनकर आदींनी मार्गदर्शन केले. तूर, ज्वारी, बाजरी, मुग, उडीद आदी पिकांचा पेरा मागच्या वर्षीइतकाच राहणार आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. बियाणांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करा येत्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी कोणत्याही बियाण्यांची उगवणशक्ती तपासून व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीनला चांगला हमीभाव असला तरी बाजारात ते न विकता इतर शेतकर्‍यांना द्यावे. बियाणे पेरणीबाबत काही अडचण आल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांनी केले आहे. (वार्ताहर) कळमनुरी तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ७७ हजार हेक्टर आहे. या पैकी ३७ हजार हेक्टरवर सोयाबीन तर २५ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी कोणत्याही बियाण्यांची उगवणशक्ती तपासून व बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे अधिकार्‍यांचे आवाहन