शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

५८ लाखांची वीज बिले माफ

By admin | Updated: May 30, 2014 00:35 IST

हिंगोली : गारपिटीत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सवलत देण्यात आली आहे.

हिंगोली : गारपिटीत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सवलत देण्यात आली आहे. यंदा जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके शासनाकडून भरल्या जाणार आहेत. जिल्ह्यात त्याचा फायदा १३७ गावातील ३ हजार ७९९ शेतकर्‍यांना मिळणार असून एकूण ५८ लाख ७० हजारांची बिले माफ केली आहेत. राज्यात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यात शेती पिके आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने परिपत्रक काढून विशेष पॅकेज जाहीर केले आहे. प्रामुख्याने त्यात अपद्ग्रस्त शेतकर्‍यांची जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके राज्य शासनाकडून करण्यात येणार आहेत. म्हणून जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची माहिती महावितरणने महसूल विभागाकडून मागवली होती. त्याआधी कृषी विभाग आणि महसूल विभागाने गारपीटीचा संयुक्त सर्वे केला होता. सर्वेक्षणात हाती आलेली माहिती महसूल विभागाने जिल्हा महावितरणला दिली. महावितरणने ही माहिती वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाला दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १३७ गावातील शेतीपंपधारकांना फायदा झाला आहे. एकूण ३ हजार ७९९ आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची ५८ लाख ७० हजार रूपयांची बिले माफ करण्यात आली आहेत. त्याचा सर्वाधिक फायदा औंढा नागनाथ तालुक्यातील १८ गावांतील उत्पादकांना झाला आहे. तालुक्यातील १ हजार ५७३ ग्राहकांचे २५ लाख ८७ हजारांची बिले माफ झाली आहेत. त्याखालोखाल सेनगाव तालुक्यातील २८ गावांना झाला आहे. येथील १ हजार ३४५ कृषीपंपधारकांची १९ लाख २५ हजारांची बिले माफ करण्यात आली आहेत. वसमत तालुक्यातील २१४ ग्राहकांना फायदा झाला आहे. १८ गावातील शेतकर्‍यांचे ३ लाख ६७ हजारांची बिले माफ झाली आहेत. सर्वात कमी बिले माफ कळमनुरी तालुक्यातील झाली आहेत. तालुक्यातील १३ गावातील ५०० शेतकर्‍यांची २ लाख ७७ हजार रूपयांची बिले माफ झाली आहेत. हिंगोली तालुक्यातील ६० गावांना या बिल माफीचा लाभ मिळाला आहे. ५०० शेतकर्‍यांची ७ लाख १३ हजारांची बिले माफ करण्यात आली आहेत. यंदा अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची त्रैमासिक का होईना बिले माफ झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) राज्य शासनाने परिपत्रक काढले शासनाने परिपत्रक काढून पॅकेज जाहीर केल्याने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके राज्य शासनाकडून करण्यात आली आहेत. म्हणून जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची माहिती महसूलकडून महावितरणने मागवली होती . जिल्ह्यातील १३७ गावातील एकूण ३ हजार ७९९ आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची ५८ लाख ७० हजार रूपयांची बिले करण्यात आली माफ. सर्वाधिक फायदा औंढा नागनाथ तालुक्यातील १८ गावांतील १ हजार ५७३ शेतकर्‍यांचे २५ लाख ८७ हजारांची झाली बिले माफ . हिंगोली तालुक्यातील ६० गावांना या बिल माफीचा लाभ मिळाला असून एकूण ५०० शेतकर्‍यांची ७ लाख १३ हजारांची बिले माफ . यंदा अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची बिले माफ झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला . हिंगोली महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या उशिरा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची पुनर्पडताळणी करता आली नसल्याने काही शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. लवकर याद्या प्राप्त झाल्या असल्या तर पडताळणी करून नजर चुकीने नाव न नोंदविल्या गेलेल्या शेतकर्‍यांना लाभ मिळाला असता. एम.एन. सिर्से, प्रभारी कार्यकारी अभियंता, हिंगोली. - एम.एन. सिर्से, प्रभारी कार्यकारी अभियंता, महावितरण, हिंगोली.