शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

५८ लाखांची वीज बिले माफ

By admin | Updated: May 30, 2014 00:35 IST

हिंगोली : गारपिटीत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सवलत देण्यात आली आहे.

हिंगोली : गारपिटीत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सवलत देण्यात आली आहे. यंदा जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके शासनाकडून भरल्या जाणार आहेत. जिल्ह्यात त्याचा फायदा १३७ गावातील ३ हजार ७९९ शेतकर्‍यांना मिळणार असून एकूण ५८ लाख ७० हजारांची बिले माफ केली आहेत. राज्यात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यात शेती पिके आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने परिपत्रक काढून विशेष पॅकेज जाहीर केले आहे. प्रामुख्याने त्यात अपद्ग्रस्त शेतकर्‍यांची जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके राज्य शासनाकडून करण्यात येणार आहेत. म्हणून जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची माहिती महावितरणने महसूल विभागाकडून मागवली होती. त्याआधी कृषी विभाग आणि महसूल विभागाने गारपीटीचा संयुक्त सर्वे केला होता. सर्वेक्षणात हाती आलेली माहिती महसूल विभागाने जिल्हा महावितरणला दिली. महावितरणने ही माहिती वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाला दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १३७ गावातील शेतीपंपधारकांना फायदा झाला आहे. एकूण ३ हजार ७९९ आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची ५८ लाख ७० हजार रूपयांची बिले माफ करण्यात आली आहेत. त्याचा सर्वाधिक फायदा औंढा नागनाथ तालुक्यातील १८ गावांतील उत्पादकांना झाला आहे. तालुक्यातील १ हजार ५७३ ग्राहकांचे २५ लाख ८७ हजारांची बिले माफ झाली आहेत. त्याखालोखाल सेनगाव तालुक्यातील २८ गावांना झाला आहे. येथील १ हजार ३४५ कृषीपंपधारकांची १९ लाख २५ हजारांची बिले माफ करण्यात आली आहेत. वसमत तालुक्यातील २१४ ग्राहकांना फायदा झाला आहे. १८ गावातील शेतकर्‍यांचे ३ लाख ६७ हजारांची बिले माफ झाली आहेत. सर्वात कमी बिले माफ कळमनुरी तालुक्यातील झाली आहेत. तालुक्यातील १३ गावातील ५०० शेतकर्‍यांची २ लाख ७७ हजार रूपयांची बिले माफ झाली आहेत. हिंगोली तालुक्यातील ६० गावांना या बिल माफीचा लाभ मिळाला आहे. ५०० शेतकर्‍यांची ७ लाख १३ हजारांची बिले माफ करण्यात आली आहेत. यंदा अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची त्रैमासिक का होईना बिले माफ झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) राज्य शासनाने परिपत्रक काढले शासनाने परिपत्रक काढून पॅकेज जाहीर केल्याने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके राज्य शासनाकडून करण्यात आली आहेत. म्हणून जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची माहिती महसूलकडून महावितरणने मागवली होती . जिल्ह्यातील १३७ गावातील एकूण ३ हजार ७९९ आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची ५८ लाख ७० हजार रूपयांची बिले करण्यात आली माफ. सर्वाधिक फायदा औंढा नागनाथ तालुक्यातील १८ गावांतील १ हजार ५७३ शेतकर्‍यांचे २५ लाख ८७ हजारांची झाली बिले माफ . हिंगोली तालुक्यातील ६० गावांना या बिल माफीचा लाभ मिळाला असून एकूण ५०० शेतकर्‍यांची ७ लाख १३ हजारांची बिले माफ . यंदा अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची बिले माफ झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला . हिंगोली महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या उशिरा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची पुनर्पडताळणी करता आली नसल्याने काही शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. लवकर याद्या प्राप्त झाल्या असल्या तर पडताळणी करून नजर चुकीने नाव न नोंदविल्या गेलेल्या शेतकर्‍यांना लाभ मिळाला असता. एम.एन. सिर्से, प्रभारी कार्यकारी अभियंता, हिंगोली. - एम.एन. सिर्से, प्रभारी कार्यकारी अभियंता, महावितरण, हिंगोली.