शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 13:48 IST

हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली.

ठळक मुद्देआजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले.

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : 

‘हळू याना गं लाटांनोकुणाला त्रास होईल नाइथे निजला भीम माझातयाला जाग येईल ना...’

महाकवी वामनदादा कर्डकांच्या संवेदनशील लेखणीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली ही चिंब अश्रूफुले. सद्गतीत होऊन कंठ दाटून यावा अशी भावपूर्ण आदरांजली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत लाखो गीते, कवणे, शेर, गजला कवींनी लिहिली. गायक, शाहिरांनी गायली. या आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले. हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली. आजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. 

दादरच्या सागर किनारी बाबासाहेबांचा पवित्र देह ठेवण्यात आला. बाबासाहेबांनी उभ्या हयातीत केलेल्या अथक परिश्रमावर वामनदादा पुढे लिहितात,

अशा किती तरी रात्री तयाला झोप आली ना जरासा लागला डोळातयाची झोप मोडेल ना...नकारे आसवे ढाळू इथेवामनवाणी आता तुमच्या त्या आसवांनी रे चिता ही ओली होईल ना....

वामनदादांनी बाबाच्या महापरिनिर्वाणावर शंभराहून अधिक गीते लिहिली आहेत. भीमराव दीनदलित व महिलांसाठी लढले. देह चंदनासम झिजवला. वामनदादा लिहितात, 

देह झिजला कसाअंत झाला कसाचंदनाला पुसा, चंदनाला पुसा,देहसारा भीमाचा थिजला कसाचंदनाला पुसा, चंदनाला पुसा 

बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी मुंबईत अथांग जनसागर लोटला. आक्रोश आणि भावविव्हळ न थांबऱ्या वेदना घेऊनच. कुण्या नेत्याच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीचा तो विश्वविक्रमच होता. एक कवी भावना व्यक्त करतो. ‘बाबांची डोली निघाली, अश्रू ढाळी, दलित जणांची माया ही निराळी.’ 

६ डिसेंबर ५६ रोजी बाबा गेल्याची वार्ता कळली व मेघडंबर हेलावले. कवी दिलराज भावूक होऊन व्यक्त होतात, 

‘सहा डिसेंबर छप्पन सालीवेळ कशीही हेरलीदुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली...रडे जनता टाहो फोडुनीचैत्यभूमी सागरा तिरीरात्र सहा डिसेंबरचीजीवनी राहिली चिरंतनी  एक अनाम कवी लिहितो....बाबा गेले वार्ता कळलीपायाची जमीन ढासळलीलोकांचे काळीज हादरलेझाले वेडे जन बावरले नरनारी सारे थरथरले काहीच सुचेना घाबरलेकैकांचे भानच गरगरलेआक्रोशाचे वादळ उठलेटाहोचे आभाळ गडगडले कुणी धरतीवर लोळत पडले....

कवी काशीनंदा यांना मात्र बाबासाहेबांची ती चंदनाची चिताही मुलांना संदेश देतेय असा भास होतोय, त्यांच्या भावना गायक मनोहरदीप रुसवा (भगत) अशा ओथंबलेल्या शब्दात गातात....

पेटता पेटता बोलली रे चिताजा मुलांनो आता संपली रे कथासंपल्या संपुद्या अश्रूच्या अक्षदा लाभली ती योग्य सद्गती...शब्द मोडू नका, ऊर झोडू नकाजा भविष्यामध्ये धीर सोडू नका....

उसळलेल्या जनसागराची तळमळ होती त्या भीमराणाची अभा एकदा तरी पाहण्याची. त्यासाठीची मनामनात, तनातनात सुरू असलेली धडपड एक कवी, ‘थांबा थांबा, जाळता का चंदनाची ही चिता, पाहू द्या डोळे भरूनी मज भीम हा माझा पिता,’ अशी व्याकूळ नोंदवितो. बाबांनी अतिश्रम केले. २०-२० तास वाचनलेखन करणारे बाबासाहेब तहानभूक विसरून जात. त्यातून त्यांना अनेक व्याधी जडल्या. बाबासाहेबांच्या अंतिम दिनाविषयी शाहीर साळवे म्हणतात, 

गेला भीमराणाकसा सोडून गेला दलितांचा राणामधुमेह, रक्तदाब वाढलापायांचा आजार वाढू लागलादृष्टी मंद झाली ना...

बाबासाहेबांच्या महानिर्वाणाबद्दल काही प्रवादही आहेत. त्याकडे कवींची नजर न गेली तरच नवल, गायक प्रकाशनाथ पाटणकर म्हणतात, 

घात झाला जी...नानकचंद रत्तू हे वदलामृत्यू होता की होता बदला प्रश्न गुपित आहे जी घात झाला जी...,  

अशीही शेकडो गीते तत्कालीन समाजमनावर बिंबलेली आहेत. कवी राजानंद गडपायले लिहितात,

स्मशानी आहे रे दर्याकिनारी जाऊनी आलोचितेवर देह बाबांचा मी जळता पाहूनी आलो... 

सागर किनारी चैत्यभूमीत प्रज्ञेचा सागर चिरनिद्रा घेत आहे. खळखळत्या सागरी लाटा घोंगावता आवाज करीत येतात वारंवार. अनेकदा हा सागर रौद्ररुप घेतो. त्याच्या या रुपाला पाहून एक कवी लिहितो ,   

अरे सागरा, भीम माझा येथे निजला शांत हो जरादीनासाठी कष्ठ साहिले माझ्या भीमानेहक्क मिळवून दिले मोठ्या श्रमानेसोडून गेली गाई आपल्या वासरा... 

खरंच तोड नाही हो जगात करणीला एक हिऱ्याने दीपावले धरणीला, असे म्हणत गेल्या ६१ वर्षापासून सतत दरवर्षी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमीवर जातात. आपल्या लाडक्या बाबाला अभिवादन करतात. बाबांची ही समाधी असंख्य दीनदुबळ््या, वंचितांची प्रेरणा, ऊर्जास्थान आहे. त्यावर महाकवी वामनदादांची एक अजरामर गजल अशी,

समाधीकडे ती वाटही वळावीतेथे आसवांची फुले ही गळावी...

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्यmusicसंगीत