शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 13:48 IST

हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली.

ठळक मुद्देआजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले.

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : 

‘हळू याना गं लाटांनोकुणाला त्रास होईल नाइथे निजला भीम माझातयाला जाग येईल ना...’

महाकवी वामनदादा कर्डकांच्या संवेदनशील लेखणीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली ही चिंब अश्रूफुले. सद्गतीत होऊन कंठ दाटून यावा अशी भावपूर्ण आदरांजली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत लाखो गीते, कवणे, शेर, गजला कवींनी लिहिली. गायक, शाहिरांनी गायली. या आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले. हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली. आजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. 

दादरच्या सागर किनारी बाबासाहेबांचा पवित्र देह ठेवण्यात आला. बाबासाहेबांनी उभ्या हयातीत केलेल्या अथक परिश्रमावर वामनदादा पुढे लिहितात,

अशा किती तरी रात्री तयाला झोप आली ना जरासा लागला डोळातयाची झोप मोडेल ना...नकारे आसवे ढाळू इथेवामनवाणी आता तुमच्या त्या आसवांनी रे चिता ही ओली होईल ना....

वामनदादांनी बाबाच्या महापरिनिर्वाणावर शंभराहून अधिक गीते लिहिली आहेत. भीमराव दीनदलित व महिलांसाठी लढले. देह चंदनासम झिजवला. वामनदादा लिहितात, 

देह झिजला कसाअंत झाला कसाचंदनाला पुसा, चंदनाला पुसा,देहसारा भीमाचा थिजला कसाचंदनाला पुसा, चंदनाला पुसा 

बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी मुंबईत अथांग जनसागर लोटला. आक्रोश आणि भावविव्हळ न थांबऱ्या वेदना घेऊनच. कुण्या नेत्याच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीचा तो विश्वविक्रमच होता. एक कवी भावना व्यक्त करतो. ‘बाबांची डोली निघाली, अश्रू ढाळी, दलित जणांची माया ही निराळी.’ 

६ डिसेंबर ५६ रोजी बाबा गेल्याची वार्ता कळली व मेघडंबर हेलावले. कवी दिलराज भावूक होऊन व्यक्त होतात, 

‘सहा डिसेंबर छप्पन सालीवेळ कशीही हेरलीदुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली...रडे जनता टाहो फोडुनीचैत्यभूमी सागरा तिरीरात्र सहा डिसेंबरचीजीवनी राहिली चिरंतनी  एक अनाम कवी लिहितो....बाबा गेले वार्ता कळलीपायाची जमीन ढासळलीलोकांचे काळीज हादरलेझाले वेडे जन बावरले नरनारी सारे थरथरले काहीच सुचेना घाबरलेकैकांचे भानच गरगरलेआक्रोशाचे वादळ उठलेटाहोचे आभाळ गडगडले कुणी धरतीवर लोळत पडले....

कवी काशीनंदा यांना मात्र बाबासाहेबांची ती चंदनाची चिताही मुलांना संदेश देतेय असा भास होतोय, त्यांच्या भावना गायक मनोहरदीप रुसवा (भगत) अशा ओथंबलेल्या शब्दात गातात....

पेटता पेटता बोलली रे चिताजा मुलांनो आता संपली रे कथासंपल्या संपुद्या अश्रूच्या अक्षदा लाभली ती योग्य सद्गती...शब्द मोडू नका, ऊर झोडू नकाजा भविष्यामध्ये धीर सोडू नका....

उसळलेल्या जनसागराची तळमळ होती त्या भीमराणाची अभा एकदा तरी पाहण्याची. त्यासाठीची मनामनात, तनातनात सुरू असलेली धडपड एक कवी, ‘थांबा थांबा, जाळता का चंदनाची ही चिता, पाहू द्या डोळे भरूनी मज भीम हा माझा पिता,’ अशी व्याकूळ नोंदवितो. बाबांनी अतिश्रम केले. २०-२० तास वाचनलेखन करणारे बाबासाहेब तहानभूक विसरून जात. त्यातून त्यांना अनेक व्याधी जडल्या. बाबासाहेबांच्या अंतिम दिनाविषयी शाहीर साळवे म्हणतात, 

गेला भीमराणाकसा सोडून गेला दलितांचा राणामधुमेह, रक्तदाब वाढलापायांचा आजार वाढू लागलादृष्टी मंद झाली ना...

बाबासाहेबांच्या महानिर्वाणाबद्दल काही प्रवादही आहेत. त्याकडे कवींची नजर न गेली तरच नवल, गायक प्रकाशनाथ पाटणकर म्हणतात, 

घात झाला जी...नानकचंद रत्तू हे वदलामृत्यू होता की होता बदला प्रश्न गुपित आहे जी घात झाला जी...,  

अशीही शेकडो गीते तत्कालीन समाजमनावर बिंबलेली आहेत. कवी राजानंद गडपायले लिहितात,

स्मशानी आहे रे दर्याकिनारी जाऊनी आलोचितेवर देह बाबांचा मी जळता पाहूनी आलो... 

सागर किनारी चैत्यभूमीत प्रज्ञेचा सागर चिरनिद्रा घेत आहे. खळखळत्या सागरी लाटा घोंगावता आवाज करीत येतात वारंवार. अनेकदा हा सागर रौद्ररुप घेतो. त्याच्या या रुपाला पाहून एक कवी लिहितो ,   

अरे सागरा, भीम माझा येथे निजला शांत हो जरादीनासाठी कष्ठ साहिले माझ्या भीमानेहक्क मिळवून दिले मोठ्या श्रमानेसोडून गेली गाई आपल्या वासरा... 

खरंच तोड नाही हो जगात करणीला एक हिऱ्याने दीपावले धरणीला, असे म्हणत गेल्या ६१ वर्षापासून सतत दरवर्षी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमीवर जातात. आपल्या लाडक्या बाबाला अभिवादन करतात. बाबांची ही समाधी असंख्य दीनदुबळ््या, वंचितांची प्रेरणा, ऊर्जास्थान आहे. त्यावर महाकवी वामनदादांची एक अजरामर गजल अशी,

समाधीकडे ती वाटही वळावीतेथे आसवांची फुले ही गळावी...

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्यmusicसंगीत