शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'काहीजण चुकीचं विधानं करत आहेत, सर्वांनी शांतता पाळावी'; ठाकरे गटाच्या नेत्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 12:55 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, शातंता राखण्याचे आवाहन चुकीची विधानं न करण्याचे आवाहन केलं आहे. 

काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरातील राम मंदिराजवळ परिसरात काही समाज कंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटात दगडफेक झाली. यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, शातंता राखण्याचे आवाहन चुकीची विधानं न करण्याचे आवाहन केलं आहे. 

काल मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे पोलीस यंत्रणेवर ताण आला. या गोंधळात पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आली आहेत. पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळली. पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेनंतर आज राजकीय वर्तुळातून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकारवर आरोप केले. यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.  

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वादानंतर शांतता; दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना ही दुर्देवी आहे, आता तिथे शांतता प्रस्थापीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेत्यांकडून भडकवणारे स्टेटमेंट देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थीतीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजले पाहिजे, सर्वांनी शांतता पाळावी, ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता पोलीस गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. 

पालकमंत्री भुमरे यांनी केले आवाहन

काल झालेल्या वादातून त्याठिकाणी दहा ते बारा गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, या ठिकाणी भुमरे यांनी भेट देत पाहणी केली. कोणी दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी भुमरे यांनी सांगितले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे तरी जनतेने शांतता ठेवावी आणि रामनवमी पार पाडावी. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु आज आपण सर्वांनी शांतता पाळून शांततेत सणउत्सव पार पाडावेत, असंही पालकमंत्री भुमरे म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा